Quantcast
Channel: BookHungama
Viewing all 1118 articles
Browse latest View live

कवडसा–प्रांजली ढेरे

$
0
0

कमीत कमी शब्दात किती मोट्ठे चित्र उभे केले आहे प्रांजलीने....

कवडसा – प्रांजली ढेरे

सूर्याचे किरण त्या लाल बाटलीवर पडले आणि त्या बाटलीचा तो लाल रंग पांढऱ्या टेबलवर पडला. अगदी एक अशी प्रकाश शलाका.

तिला अगदी सहजच वाटून गेलं की, माझ्या बेरंग आयुष्यावर तुझ्या रूपात असाच एक लाल रंगाचा कवडसा आला होता आणि आता परत पांढरा रंग वागवत बसायचं आहे. आयुष्यभर!


प्रेयसी–दिपाली चव्हाण

$
0
0

दिपाली सुद्धा लेखन कार्यशाळेतील सहकारी....किती सुंदर गोष्ट लिहिली आहे तिने. त्या सहा तासात काहीतरी घडत हे नक्की.

प्रेयसी – दिपाली चव्हाण

वाह! मस्त थंडगार वारा, दाटून आलेले काळेकुट्ट ढग आणि बसमध्ये मिळालेली विंडो सीट, awesome. अश्या वातावरणात ऐरोली ते जोगेश्वरी प्रवास पीक आवर्स मध्ये ही मस्त वाटतोय. असं रोज ऑफिसमधून वेळेवर निघायला मिळालं तर किती छान! आज पाऊस पडणार नक्की. ढग खूपच भरून आले आहेत.वाटतंय, प्रेयसीच जणू तिच्या प्रियकराच्या येण्याची उत्कंठतेने वाट पाहतेय आणि तो येताच क्षणी त्याच्यावर बरसण्याचं फुल्ल प्लँनिंग करून आहे.

पवई लेक येईल आता. उतरू का लेकला? नेहमीप्रमाणे आजही गर्दी आहे. कुणी ऑफिसहून कंटाळून आले आहेत, कुणी इव्हनिंग वॉकसाठी तर कुणी गप्पा मारण्यासाठी थांबले आहेत. प्रेमात आकंठ बुडालेली जोडपीही आहेत जी प्रेम करता करता पोलिसांवरही लक्ष ठेवून आहेत की ते येतील आणि इथून आपल्याला पळवतील किंवा आपल्याला ओरडतील. पण प्रेम करणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे आणि ते ही बिनधास्त एकमेकांमध्ये गुंतलेले, दोन-तीन फुटावर असलेल्या इतर लोकांचाही विसर पडावा एवढे प्रेमात बुडालेले. आमची मुंबई, लव्ह यु मुंबई फॉर धिसस :)

देव, मला ही असं बिनधास्त, एकमेकांत आकंठ बुडालेलं वगैरे म्हणतात ना तसं प्रेम हवयं. असे नजारे दाखवले की तू यातली खरी आणि खोटी नाती किती याचा हिशोब मांडायला सांगायचास. पण देव तरीही त्या क्षणातलं प्रेम, स्पर्श, मिठी, विश्वास, सहवास एवढं मात्र खरं आहे रे.

फोन करू का देवला?

तिथेही असचं वातावरण असेल हे नक्की. पण त्याला माझी आठवण नाही आली. निदान एक कॉल तरी. मीच नेहमी कॉल का करू? पण हा क्षण पुन्हा कधी येणार? याआधी असे कितीतरी क्षण भांडणात घालवले आहेत. यावर्षीही पावसातल्या तुझ्या सोबतीचं स्वप्न अधुरं राहणार. आणि मग वर्षभर पुढच्या पावसाची वाट पहाणं आणि भेटीची स्वप्नच पहाणं...

हॅलो, कुठे आहेस?.......

बाहेर. काम आहे......

तिथं पावसाचं वातावरण आहे का?

......हो,

तिथे? ....... आहे.[ आतातरी म्हण, मला सगळी कामं सोडून तुला येऊन भेटावसं वाटतंय :( मलाच विचारावं लागणार.] येतोस भेटायला? ......

सॉरी जरा काम आहे......

ओके, ठेवते मी फोन. बाय......

काय यार! का मी फोन केला? याचा रिस्पॉन्स माहित होता. मूर्ख मी. सॉरी म्हटल्यावर पुढचं माहित होतं मग ऐकावासाचं वाटत नाही. आता मीच impatiently फोन ठेवते म्हणायला हा तयार असणार.

I don’t want to miss this moment. जाऊ दे. उतरते मी. लेककडे पहात, गार वारा अंगावर झेलत इथंच रहावस वाटतंय. डिअर वारा, आता तू तरी थोडावेळ असाच सोबत राहा. काहीजण टोविंग वाले बाईक नेतील या धास्तीने बाईक वर बसूनच लेक व्ह्यू बघत तिच्या सोबतीची मजा घेत आहेत. आधी बाईक वरून मस्ती, रोमान्स करत जाणारे कपल्स बघितलं की किती असभ्य आहेत हे असं वाटायचं. याना घर नाहीए का हे सगळं करायला. पण आता ते क्षण मलाही जगावेसे वाटताहेत. काय थ्रिल असेल ना! आजूबाजूला वयस्कर असोत, उच्च शिक्षित असोत, की अजून कुणी. सगळ्यांना फाट्यावर मारत, गार वारा अंगावर झेलत आणि तरीही आपल्या मस्तीचा खट्याळपणाचा त्याच्या ड्रायव्हिंगला त्रास होणार नाही ना याची काळजी घेत, त्याला सतावत, प्रेम करत आपला क्षण जगायचं.

सुरवातीचे सोनेरी दिवस का संपून गेले इतक्या लवकर देव? मला आता नाही भांडायचं देव तुझ्याशी. तू तुझा पास्ट बद्दल लपवलंस हे विसरायचं आहे मला, आपल्या भेटी वाढायला लागल्यावर तुला मला भेटल्याचा आनंद, माझ्याशी बोलतानाची excitement कमी होत गेली याचा राग विसरायचा आहे मला, फिरायला गेल्यावर सेल्फी काढून झाल्यावर आपल्याकडे एकमेकांशी बोलायला काहीच उरत नाही याची चिडचिड करायची नाही आता मला. मी नाही रागवणार, भांडणार पण तू ये ना देव. पूर्वीसारखा.

अपेक्षा, भांडण, चुका काढणं यात ते क्षण जगायचे राहून गेलेत रे आपले. तुला याचा त्रास का होत नाही. कसं समजावू तुला, मला ते क्षण जगायचे आहेत रे. तुझी प्रेयसी बनून भरभरून जगायचं आहे. आणि त्या सुंदर आठवणी सोबत घेऊन मग तुझी पत्नी बनून तुझ्याच सोबत संसार करायचा आहे. प्रियकर-प्रेयसीचं नातं पूर्ण अनुभवायच्या आधीच पती-पत्नी बनण्याची स्वप्न बघायला खूप घाई केली का रे आपण?

एकदा तूही बन ना होतास तसाच. प्रेमाची गरज असलेला. माझं हसणं आवडायचं ना तुला? मला ही तुझा निर्भीड स्वभाव आवडायचा आणि त्याहीपेक्षा तू एक्सप्रेस केलेलं प्रेम. खूप सुंदर दिवस होते ते. खूपच कमी but most beautiful days.

डोळ्यांच्या कडा ओलावताहेत. पण मला रडायचं नाही आहे. तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही सांगणारा तू सोबत नाही आहेस. बघ ना देव, केसांना हलकेच बाजूला सारून तो तिच्या कपाळावर चुंबन देतोय. शाश्वती देतोय आपल्या प्रेमाची, कायम सोबत असण्याची. आपणही जगूया ना असा क्षण. असे उत्कट रोमँटिक क्षण न मागता तू दे ना मला देव. चल ना, पुन्हा नव्याने सुरवात करू........

हॅलो,

कुठे आहेस?........

पवई लेकला थांबली आहे.........

का? कोण आहे सोबत?.........

असचं. एकटेपणा, रोमँटिक असं काहीस फील होत होतं. येतोस?

भविष्य–माधवी वैद्य

$
0
0

आणि हा शेवट दुसरा.......

भविष्य – डॉ. माधवी वैद्य

काळाच्या प्रवाहात काही भूत भविष्य असं असतं का ? का एकच कालप्रवाह एकसंधपणे वहात असतो ? आणि आपण त्यात वाहून जात असतो ? तिच्या टेबलावर असणार्या् वाळूच्या घड्याळाशी खेळत खेळत ती आपल्या मनातल्या विचारांचा गुंता सोडवू बघत होती.एक मन तिला सांगत होतं,तसं काही नसतं .भूतकाळ हा हातून निसटून गेलेली गोष्ट आहे.आणि भविष्यकाळात काय घडणार आहे, त्याचं भविष्य कोण काय आणि कसं सांगणार? तेव्हा तात्पर्य हे की जगताना वर्तमानातला क्षण खरा, जो आपल्या हातात असतो.आपण तोच एक क्षण पकडायला हवा.तो जाणूनही घ्यायला हवा. त्या क्षणा चा विचार करणं हे शहाणपणाचं.तो क्षण चांगला जगणं म्हणजे जीवन जगणं.अलिकडल्या,पलिकडल्या क्षणांकडे बघून चालत नाही, चालणारही नाही.फसगत होईल माणसाची.त्याच्या जगण्याची. हा विचार तिच्या मनात आला आणि कोणीतरी हसल्यासारखं तिला वाटलं.खरंच कोणी हसलं? का भास झाला आपल्याला? तिनं चमकून इकडे तिकडे पाहिलं. आजूबाजूला,पाठीमागे,पुढे तर कोणीच नव्हतं. मग कोण हसलं? तिनं खिडकीतलन समोर पाहिलं. झाडाची फांदी हलली होती. हलताना विचित्र आवाज करत होती. कसला आवाज? असा कसा हा फांदी हलण्याचा विचित्र आवाज? कोणी हलवली ही फांदी? असा विचार तिच्या मनात आला मात्र झाडाच्या फांदीवर एक घुबड येऊन बसलं. विचित्र घुबड अशुभ दर्शक घुबड....म्हणजे आपल्या मनात येणार्यां विचाराला चॅलेंज करायला तर आलं नव्हतं ना! हे घुबड? हेच तर विकट हास्य करत नव्हतं? .... तिच्या अंगावर या विचारासरशी सर्रकन काटाच आला.

तिला आपले शाळेतले दिवस आठवले. तिची एक मैत्रीण,दिसायला काळी कुट्ट,नाकानं नकटी चपटी पण भाव खात असे. वेळ मिळाला की सगळ्या मैत्रिणीतिच्या भोवती घोळका करीत असत.तिला इतका भाव मिळत असे कारण ती समोरच्याचा हात बघून भविष्य सांगत असे. हिला याचे हसूच येई. असंही मनात येत असे हिच्या की हे येडंबांगड सांगून सांगून काय भविष्य सांगणार? आणि त्या शेंब ड्या पोरी तरी हिला काय असं भविष्य विचारणार?पण तिनं सांगितलेलं भविेष्य मात्र खरं निघतअसे आपल्या चपट्या नाकावरचा जाड भिंगांचा चष्मा सारखा वरती सरकवत ती मुलींना सांगे, ‘गणितात तू पास होशील,पण अभ्यास केला पाहिजेस.’ हिला त्याचे प्रचंड हसू येई. हे काय भविष्य कथन म्हणायचं का? असंही तिला वाटे. पण एक दिवस मात्र तिनं हिला चमकवलंच. जवळ येऊन तिचा हात बघू न सांगितलंन,‘ लवकर घरी जा. पळत जा. तुझे वडील तुझी खूप आठवण काढत आहेत. लवकर गेलीस तरच त्यांची आणि तुझी गाठ पडू शकेल. शेवटच्या घटका मोजत आहेत ते...’ तिनं हे ऐकलं मात्र, घराकडे धूमच ठोकली. पाटी दप्तर घेण्याचंही भान तिला राहिलं नव्हतं. शाळेच्या गेटाकडे जाता जाताच तिला घाम फुटला होता. घाम पुसता पुसता तिनं सहज तिच्या आवडत्या चिंचेच्या झाडाकडे बघितलं... झाडाची एक फांदी विचित्र हलल्याचा भास झाला तिला..... आणि अचानक फडफडत एक मोठं घुबड येऊन त्या फांदीवर बसलं. एकवार दचकल्या सारखं तिला झालं खरं... तिनं घराकडे धूम ठोकली. घरी जाऊन बघते तो काय,विचित्रशा शांततेत काही लोक घरासमोर गोळा झाले होते. तिनं त्या शांत तेच्या वरूनच अंदाज केला की नकटीचं भविष्य खरं ठरलेलं दिसतंय...तिचा अंदाज खरा निघाला.. तिच्या डोक्यायरचं पितृछत्र काळानं हिसकावून घेतलेलं होतं...म्हणजे आपला चपटी बाबतचा अंदाज त्या चपटीनं खोटा ठरवलान ... तिला खरंच भविष्याचे वेध कळत होते तर... या विचारानं मात्र ती पुरती हादरली... तेव्हा पासून या भविष्याबाबतचा गुंता तिच्या मनात गुंतत राहिला...म्हणजे माणसाला भविष्यात डोकावता येतं तर...

ती पदवीधर झाली. आईनं एका काळजीतून मुक्त होण्यासाठी तिचं लग्न करून दिलं.खरं तर तिला स्थळ पसंत आहे की नाही याचाही कोणी फारसा विचार केला नाही. तिचं लग्न होणं,म्हणजे एका जबाबदारीतून सुटका, इतकाच त्याचा अर्थ होता. तिनंही मग चारचौघींसारखाच पदरी पडलेला संसार स्वीकारला आणि तसं म्हणाल तर घरासाठी ती तशी राबतच होती.संसारात रमण्याचा भाग कमी, कर्तव्याचा भाग जास्त होता. कधी कधी तिच्या मनाला उद्विग्नता येई. मग ती मुकाटपणे खिडकीपाशी येई. टेबलावरचं वाळूचं घड्याळ तिचं मन रमवायला सज्ज असेच. ती एकटक त्या काळप्रवाहाकडे बघत बसे .आजही ती तशीच बसली.आजही तशीच खिडकीतून दिसणारी चिंचेची फांदी हलली आणि आजही तेच अशुभ दर्शक घुबड त्या फांदीवर आपले पंख फडफडवतअचानक येऊन बसले...ती या घटनेचा अर्थ काय लावायचा ? या विचारानं गांगरून गेली होती. तिला आज शाळेतल्यात्या चपटीची आठवण झाली, तिचा पत्ता कसा मिळवायचा? तिची गाठ पडली असती तर तिला या पुन्हा अचानक अवतीर्ण झालेल्या घटनेचा अर्थ तरी विचारला असता...

काळ ही काही तरी अजब चीज आहे आणि आपण त्याचे सावज आहोत,असहाय्य सावज आहोत,हा विचार तिच्या मनात ठाण मांडून बसला...तिला काही सुचेना. ती तिरीमिरीनं उठली, घरातून बाहेर पडली. कुठे जात आहोत,जाणार आहोत,हे तिच्या काही हिशेबीही नव्हते.मनाची विचित्र अवस्था झाली होती तिच्या.तिला खूप अस्वस्थता जाणवत होती. ती घरातून बाहेर पडल्यावर सुसाट वेगानं चालू लागली.तिला काय झालं होतं ते तिचं तिलाच कळेनासं झालं होतं.पण वडिलांच्या निधना च्या भविष्य कथनाचा तिनं इतका विदारक अनुभव घेतला होता की त्याच्या नुसत्या आठवणीनंच तिचं मन थरकाप होूऊन उठलं होतं. सुसाट चालता चालता तिचा पाय एका दगडाला लागून ठेचकाळला. जबरदस्त ठेच लागल्यानं तिच्या पायाची कळ अगदी मस्तकात गेली,जीव विव्हळला. एका पायानं दुसर्या पायाच्या ठेच लागलेल्या भागावर जोर देण्यासाठी ती अंमळ थांबली. तिला खरं तर घोटभर पाणी हवं होतं. पण जवळपास कुठेही पाणी मिळेल अशी शक्यता नव्हती.तरीही तिची नजर पाणी शोध त शोधत भिरभिरत होती. तिला समजत नव्हतं ,घोटभर पाण्यासाठी आपलं मन तरसतं आहे ? की शरीर ?...पाण्यासाठी धुंडाळणार्याज नजरेला पाण्याचा नाही पण दुसर्यामच गोष्टीचा शोध लागला...

तिच्या शोध घेणार्या् नजरेनं बघितलं, झाडाच्या सावलीत एक ज्योतिषी बसला होता. गळ्यात विचित्र माळा,कपाळाला टिळा, भूत भविष्याचा वेध घेणारी त्याची ती आरपार नजर! त्याच्या जवळ एक पिंजरा होता. त्यात एक रंग उडालेला पोपट होता. पिंजर्या पुढे काही कार्डस ओळीनं मांडून ठेवलेली होती. डोक्याला मुंडासं बांधलेला,भरघोस मिशा असलेला तो ज्योतिषी त्याच्या समोर बसले ल्या दोन माणसांपाशी काही तरीहळुहळू कुजबुजत,कुजबुजत काही बाही प्रश्न विचारत होता. आणि ते दोघेजणं आपल्या भाग्यात पुढे काय काय घडणार आहे,हे समजून घेण्याच्या इच्छेनं अगतिक होऊन त्याच्या अगदी आधीन होऊन ,लाचार हो ऊन बसले होते. हिच्या मनात आता पुढे काय घडणार, याची उत्कंठा निर्र्मानण झाली.तिच्या पायाला लागलेली ठेच तिला आता जरा सुसह्य वाटायला लागली. ती उत्सुकतेनं पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी अधीर झाली. आपल्याला तहान लागलेली होती याचाही तिला विसर पडला.त्या कुडमुड्या ज्योतिषाचा हात बघण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा तास आता संपला होता. आता त्यानं आपला मोर्चा पिंजर्यााकडे वळवला.ती अधिक सतर्क होऊन बघत राहिली.त्यानं पिंजर्या.चं दार उघडलं. पिंजर्यायवर टिचक्या मारत त्या पोपटाला बाहेर यायचं जणू निमंत्रणच दिलं. तो पोपट सराइतासारखा बाहेर आला.त्यानं इकडे तिकडे माना वेळावत मग आपली चाल त्या कार्डांच्या दिशेनं चालली. आता त्या शुक मुनींनी बर्याेच विचाराअंती एक कार्ड उचलून त्या ज्योतिषाच्या हाती दिले शुकमहाराजांच्या या कामगिरी वर सारेच खूष झाले ! इतके झाल्यावर शुक महाराज परत आपल्या गढीत म्हणजे पिंजर्यारत ध्यानस्थ जाऊन बसले...ते कार्ड त्या ज्योतिषानं त्या दोघांना समजावून सांगितले. त्या दोघांनाही मग‘ खुल जा सिम सिम’ सारखे भविष्याचे दार उघडल्या सारखे वाटले असावे. त्यांच्या अज्ञाताच्या गुहेत झाकून बघताना त्यांना काही चांगले गवसले असावे, कारण त्यांच्या चेहेर्यातवरचा तो आनंद चक्कवाचता येत होता...

हे बघून आता ती ही उद्दीपित झाली होती. तिला वाटले चपटी नसली तरी काय झालं, या ज्योतिषाकडून आपल्याला आपल्या भविष्यात डोकावण्याची संधी मिळेल ती आपण घ्यावी का? ते अशुभ घुबड आपल्याला परत परत दिसतं आहे,याचा संकेत काय? याचं तरी उत्तर आपल्याला मिळू शकेल. आपलं मन जरा निवेल तरी.तिनं मनाचा हिय्या केला आणि ती त्याच्या समोर जाऊन बसली देखील. कशी जाऊन बसली ते तिचं तिलाच कळलं नाही... खरं तर ती काही अगदी सामान्य घरातून आलेली नव्हती. तिच्या सार‘या शिकल्या सवरलेल्या मुलीनं भर रहदारीच्या रस्त्यात असं फतकल मारून बसणं,जरा विचित्रच होतं. पण तरीही तिला बसावंसं वाटलं. मनातल्या अस्वस्थतेनं तिला तसं करण्यास भाग पाडलं. आपण कोण आहोत,कुठल्या घरातल्या आहोत,आपल्याला असं बसणं शोभेल का? हा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. तिच्या चेहेर्या्वरचे भाव बघून ज्योतिषालाही समजायला वेळ लागला नसावा की सावज आपल्या हातात यायला मुळीच वेळ लागणार नाही. तो औत्सुक्यानं पुढं सरकला. भविष्यात डोकावण्यासाठी तिनं उतावळेपणानं आपला हात त्याच्या समोर धरला. त्यानं आपल्या उपरण्यानं तिचा हात पुसून घेतला आणि म्हणाला, ‘ताई! बाय माझी ,का एवढा थरकाप उडालाय जिवाचा? जीव थार्या वर नाही तुझा माय ...हाताच्या रेषा बोलतायत ना माझ्याशी. काय दिसतं तुला सारखं सारखं? घुबड दिसतं तुला?चिचेची फांदी हलती का? त्यावर घुबड येऊन बसतं का?’ ती चकितच झाली. या ज्योतिषाला हे कसं कळलं? म्हणजे हा खरंच त्रिकाल ज्ञानी आहे की काय? तिनं आपला हात आता त्याच्यावर विश्वासत आणखीन जरा पुढे केला... तो तिला विचारू लागला, ‘तू इथे कशाला आली मला कळले. मनात अस्वस्थतेचा डोंब उसळलाय ना तुझ्या? या पिंजर्याततल्या पोपटासारखी अवस्था झाली आहे ना तुझी? हं..हातच सांगतोय तुझा. सक्तीचा संसार लाग लाय तुझ्या मागे खरं ना? मन रमेना तुझं संसारात..पिंजर्या.त बसली आहेस राघू होऊन.’ तिला वाटलं अरे बापरे! म्हणजे हा तर मनकवडाही निघाला. इतकं कसं सारं बरोब्बर ओळखतो आहे हा? ... तिनं विचारलं,‘ हो... पण या संसाराच्या पिंजर्यालतून सुटका? होईल सुटका माझी?’ तो मिशीत हसला. म्हणाला,‘ बघू यात ना! आमचे महाराज काय म्हणतात ते! आपल्या हाती काय असतंय! आपण ‘कालके बंदे’! ’त्यानं पिंजर्या वर टिचकी मारली. पिंजर्‍याचं दार उघडलं. शुक महाराज पिंजर्याकतून बाहेर आले. तिथे ठेवलेल्या कार्र्डजसकडे पावलं टाकत गेले. एक कार्ड त्या पोपटानं उचललं आणि त्या ज्योतिषाला द्यायच्या ऐवजी तिच्याच हातात दिलं. तो ज्योतिषी ही चक्रावून गेला. इतके दिवस तो हा भविष्य कथनाचा खेळ मांडून बसला होता, पण असं कधीच घडलं नव्हतं. कार्ड नेमकं ज्योतिषाकडेच दिलं जाई. ती देखील दचकली. कार्डावरचा मजकूर आता वाचावा की नाही या संभ‘मात असतानाच तिच्या डोक्यावरची झाडाची फांदी विचित्र हलली. ती भांबावून गेली.. अरे बापरे! म्हणजे आता घुबडही येणार का काय? तिचं मन चरकलं. अगदी अनाहूतपणे तिनं कार्डावरच्या मजकुरावर नजर टाकली. त्यावर लिहिलं होतं, ‘शक्य तितक्या लवकर इथून पळ काढा. काहीतरी अघटित घडणार आहे. तुम्ही त्यात सापडण्याची शक्यता आहे. तुमच्याही बाबतीत काहीतरी अघटित घडणार आहे. तुम्हाला सहा महिन्यांनी मृत्युयोग आहे.’ हे काय विचित्र लिहिलंय इथं? खरंच असं होईल?.... झाडाच्या फांदीवर कसलातरी विचित्र आवाज झाला. आणि ते घुबड फांदीवर येऊन बसलं..आता मात्र ती संपूर्ण घामानं निथळून निघाली. क्षणाचाही विचार न करता तिनं तिथून धूम ठोकली. घरी येऊन तिनं आधी आपल्या खोलीतली ‘ती’ खिडकी लावून घेतली. टेबलावरच्या वाळूच्या घड्टाळाकडे तिचं लक्ष गेलं तर त्यातली वाळू संपूर्णपणे ओघळून गेली होती...

(शेवट 2)

त्यानंतर ती मोजून सहा महिने आला दिवस आसुसून, आनंदानं,प्रत्येक क्षण सार्थकी लावत जगली. आपलं आयुष्य आता सहा महिन्यांनी सरणार...म्हणजे आपल्या पारंपारिक समजुतीप्रमाणे महत प्रयासानं मिळालेला हा मनुष्य जन्म सहा महिन्यानंतर संपणार...तेव्हा आता जो काळ आपल्या हाताशी आहे, तो सहा महिने इतकाच असेना का पण त्यातला प्रत्येक क्षण आपल्यासाठी आनंद निधानाचा असला पाहिजे, अशी तिची मनोधारणा झाली. तिला आतून फुलावं,डोलावं असं वाटायला लागलं,ती गाणं गुणगुणायला लागली. वार्यााबरोबर डोलायला लागली, पक्ष्यांबरोबर बोलायला लागली, फुलांबरोबर फुलायला लागली, पावसात नाचायला लागली, वार्याासवे भांडायला लागली. निसर्गातला प्रत्येक रंग तिला न्हाऊ घालायला लागला आणि प्रत्येक चांदणी तिला खुणवायला लागली. जगणं सुंदर आहे, याचा प्रत्यय तिला प्रखरतेनं आला, या सहा महिन्यात आपली जगण्याची उमेद हजार पटींनी वाढलेली आहे हे तिच्या लक्षात आलं. या काळात तिच्या मनाला ना काळा चा विचार भेडसावून गेला,ना खिडकीतून दिसणारी ती चिंचेची फांदी विचित्र हलली, ना त्या फांदीवर ते अशुभ दर्शक घुबड येऊन बसलं. जगण्याचा अर्थ कळायला लागल्यावर मरण ही एक अफवा आहे, असं तिला वाटायला लागलं...तिनं लावून घेतलेली खिडकी संपूर्णपणे उघडली..ती सहाव्या महिन्याच्या शेवटच्या रात्री निर्धास्त झोपी गेली ते उद्याला आपल्याला सूर्याच्याब पहिल्या किरणाचं स्वागत करायचं आहे, याच निर्धारानं...पहाटे पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटानं तिला जाग आली. तिनं हात जोडून वैश्विक शक्तीचे आभार मानले.

------------------------------------------------------------------काही दिवस गेले. आता तिचं सतत धास्तावलेलं मन शांत झालं होतं. ती परत एकदा त्याच रस्त्यावरून फिरायला गेली, जिथे तो ज्योतिषी बसला होता. पण तो ज्योतिषी मात्र तिथे नव्हता. चौकशी केल्यावर तिला कळलं की तो ज्योतिषी सहा महिन्यांपूर्वीच एका बाईचं भविष्य सांगतासांगता हार्ट अॅशटॅकनं गेला

तिला वाटलं चला, आपण थोडक्यात वाचलो. नाहीतर आपण त्याच्या मृत्यूच्या घटनेत उगाच गोवले गेलो असतो...तिनं जास्त विचार न करता एक खूणगाठ मात्र मनाशी बांधली. आता भूतकाळात डोकावायचं नाही, भविष्य जाणून घेण्याच्या फंदातही पडायचं नाही.भूत भविष्याच्या गुंत्यात न आडकता फक्त वर्तमान क्षण आपला मानायचा... --------------------------------------------------------------------------------------------------------------

भविष्य–माधवी वैद्य

$
0
0

नुक्कड म्हणजे प्रयोग ... नुक्कड च्या स्थापने पासून ज्यांनी नुक्कड फक्त निर्व्याज प्रेम दिल...त्या डॉ. माधवी वैद्य आज एकच कथा दोन शेवटा सहित आपल्यापुढे मांडीत आहेत.

भविष्य – डॉ. माधवी वैद्य

काळाच्या प्रवाहात काही भूत भविष्य असं असतं का ? का एकच कालप्रवाह एकसंधपणे वहात असतो ? आणि आपण त्यात वाहून जात असतो ? तिच्या टेबलावर असणार्या् वाळूच्या घड्याळाशी खेळत खेळत ती आपल्या मनातल्या विचारांचा गुंता सोडवू बघत होती.एक मन तिला सांगत होतं,तसं काही नसतं .भूतकाळ हा हातून निसटून गेलेली गोष्ट आहे.आणि भविष्यकाळात काय घडणार आहे, त्याचं भविष्य कोण काय आणि कसं सांगणार? तेव्हा तात्पर्य हे की जगताना वर्तमानातला क्षण खरा, जो आपल्या हातात असतो.आपण तोच एक क्षण पकडायला हवा.तो जाणूनही घ्यायला हवा. त्या क्षणा चा विचार करणं हे शहाणपणाचं.तो क्षण चांगला जगणं म्हणजे जीवन जगणं.अलिकडल्या,पलिकडल्या क्षणांकडे बघून चालत नाही, चालणारही नाही.फसगत होईल माणसाची.त्याच्या जगण्याची. हा विचार तिच्या मनात आला आणि कोणीतरी हसल्यासारखं तिला वाटलं.खरंच कोणी हसलं? का भास झाला आपल्याला? तिनं चमकून इकडे तिकडे पाहिलं. आजूबाजूला,पाठीमागे,पुढे तर कोणीच नव्हतं. मग कोण हसलं? तिनं खिडकीतलन समोर पाहिलं. झाडाची फांदी हलली होती. हलताना विचित्र आवाज करत होती. कसला आवाज? असा कसा हा फांदी हलण्याचा विचित्र आवाज? कोणी हलवली ही फांदी? असा विचार तिच्या मनात आला मात्र झाडाच्या फांदीवर एक घुबड येऊन बसलं. विचित्र घुबड अशुभ दर्शक घुबड....म्हणजे आपल्या मनात येणार्यां विचाराला चॅलेंज करायला तर आलं नव्हतं ना! हे घुबड? हेच तर विकट हास्य करत नव्हतं? .... तिच्या अंगावर या विचारासरशी सर्रकन काटाच आला.

तिला आपले शाळेतले दिवस आठवले. तिची एक मैत्रीण,दिसायला काळी कुट्ट,नाकानं नकटी चपटी पण भाव खात असे. वेळ मिळाला की सगळ्या मैत्रिणीतिच्या भोवती घोळका करीत असत.तिला इतका भाव मिळत असे कारण ती समोरच्याचा हात बघून भविष्य सांगत असे. हिला याचे हसूच येई. असंही मनात येत असे हिच्या की हे येडंबांगड सांगून सांगून काय भविष्य सांगणार? आणि त्या शेंब ड्या पोरी तरी हिला काय असं भविष्य विचारणार?पण तिनं सांगितलेलं भविेष्य मात्र खरं निघतअसे आपल्या चपट्या नाकावरचा जाड भिंगांचा चष्मा सारखा वरती सरकवत ती मुलींना सांगे, ‘गणितात तू पास होशील,पण अभ्यास केला पाहिजेस.’ हिला त्याचे प्रचंड हसू येई. हे काय भविष्य कथन म्हणायचं का? असंही तिला वाटे. पण एक दिवस मात्र तिनं हिला चमकवलंच. जवळ येऊन तिचा हात बघू न सांगितलंन,‘ लवकर घरी जा. पळत जा. तुझे वडील तुझी खूप आठवण काढत आहेत. लवकर गेलीस तरच त्यांची आणि तुझी गाठ पडू शकेल. शेवटच्या घटका मोजत आहेत ते...’ तिनं हे ऐकलं मात्र, घराकडे धूमच ठोकली. पाटी दप्तर घेण्याचंही भान तिला राहिलं नव्हतं. शाळेच्या गेटाकडे जाता जाताच तिला घाम फुटला होता. घाम पुसता पुसता तिनं सहज तिच्या आवडत्या चिंचेच्या झाडाकडे बघितलं... झाडाची एक फांदी विचित्र हलल्याचा भास झाला तिला..... आणि अचानक फडफडत एक मोठं घुबड येऊन त्या फांदीवर बसलं. एकवार दचकल्या सारखं तिला झालं खरं... तिनं घराकडे धूम ठोकली. घरी जाऊन बघते तो काय,विचित्रशा शांततेत काही लोक घरासमोर गोळा झाले होते. तिनं त्या शांत तेच्या वरूनच अंदाज केला की नकटीचं भविष्य खरं ठरलेलं दिसतंय...तिचा अंदाज खरा निघाला.. तिच्या डोक्यायरचं पितृछत्र काळानं हिसकावून घेतलेलं होतं...म्हणजे आपला चपटी बाबतचा अंदाज त्या चपटीनं खोटा ठरवलान ... तिला खरंच भविष्याचे वेध कळत होते तर... या विचारानं मात्र ती पुरती हादरली... तेव्हा पासून या भविष्याबाबतचा गुंता तिच्या मनात गुंतत राहिला...म्हणजे माणसाला भविष्यात डोकावता येतं तर...

ती पदवीधर झाली. आईनं एका काळजीतून मुक्त होण्यासाठी तिचं लग्न करून दिलं.खरं तर तिला स्थळ पसंत आहे की नाही याचाही कोणी फारसा विचार केला नाही. तिचं लग्न होणं,म्हणजे एका जबाबदारीतून सुटका, इतकाच त्याचा अर्थ होता. तिनंही मग चारचौघींसारखाच पदरी पडलेला संसार स्वीकारला आणि तसं म्हणाल तर घरासाठी ती तशी राबतच होती.संसारात रमण्याचा भाग कमी, कर्तव्याचा भाग जास्त होता. कधी कधी तिच्या मनाला उद्विग्नता येई. मग ती मुकाटपणे खिडकीपाशी येई. टेबलावरचं वाळूचं घड्याळ तिचं मन रमवायला सज्ज असेच. ती एकटक त्या काळप्रवाहाकडे बघत बसे .आजही ती तशीच बसली.आजही तशीच खिडकीतून दिसणारी चिंचेची फांदी हलली आणि आजही तेच अशुभ दर्शक घुबड त्या फांदीवर आपले पंख फडफडवतअचानक येऊन बसले...ती या घटनेचा अर्थ काय लावायचा ? या विचारानं गांगरून गेली होती. तिला आज शाळेतल्यात्या चपटीची आठवण झाली, तिचा पत्ता कसा मिळवायचा? तिची गाठ पडली असती तर तिला या पुन्हा अचानक अवतीर्ण झालेल्या घटनेचा अर्थ तरी विचारला असता...

काळ ही काही तरी अजब चीज आहे आणि आपण त्याचे सावज आहोत,असहाय्य सावज आहोत,हा विचार तिच्या मनात ठाण मांडून बसला...तिला काही सुचेना. ती तिरीमिरीनं उठली, घरातून बाहेर पडली. कुठे जात आहोत,जाणार आहोत,हे तिच्या काही हिशेबीही नव्हते.मनाची विचित्र अवस्था झाली होती तिच्या.तिला खूप अस्वस्थता जाणवत होती. ती घरातून बाहेर पडल्यावर सुसाट वेगानं चालू लागली.तिला काय झालं होतं ते तिचं तिलाच कळेनासं झालं होतं.पण वडिलांच्या निधना च्या भविष्य कथनाचा तिनं इतका विदारक अनुभव घेतला होता की त्याच्या नुसत्या आठवणीनंच तिचं मन थरकाप होूऊन उठलं होतं. सुसाट चालता चालता तिचा पाय एका दगडाला लागून ठेचकाळला. जबरदस्त ठेच लागल्यानं तिच्या पायाची कळ अगदी मस्तकात गेली,जीव विव्हळला. एका पायानं दुसर्या पायाच्या ठेच लागलेल्या भागावर जोर देण्यासाठी ती अंमळ थांबली. तिला खरं तर घोटभर पाणी हवं होतं. पण जवळपास कुठेही पाणी मिळेल अशी शक्यता नव्हती.तरीही तिची नजर पाणी शोध त शोधत भिरभिरत होती. तिला समजत नव्हतं ,घोटभर पाण्यासाठी आपलं मन तरसतं आहे ? की शरीर ?...पाण्यासाठी धुंडाळणार्याज नजरेला पाण्याचा नाही पण दुसर्यामच गोष्टीचा शोध लागला...

तिच्या शोध घेणार्या् नजरेनं बघितलं, झाडाच्या सावलीत एक ज्योतिषी बसला होता. गळ्यात विचित्र माळा,कपाळाला टिळा, भूत भविष्याचा वेध घेणारी त्याची ती आरपार नजर! त्याच्या जवळ एक पिंजरा होता. त्यात एक रंग उडालेला पोपट होता. पिंजर्या पुढे काही कार्डस ओळीनं मांडून ठेवलेली होती. डोक्याला मुंडासं बांधलेला,भरघोस मिशा असलेला तो ज्योतिषी त्याच्या समोर बसले ल्या दोन माणसांपाशी काही तरीहळुहळू कुजबुजत,कुजबुजत काही बाही प्रश्न विचारत होता. आणि ते दोघेजणं आपल्या भाग्यात पुढे काय काय घडणार आहे,हे समजून घेण्याच्या इच्छेनं अगतिक होऊन त्याच्या अगदी आधीन होऊन ,लाचार हो ऊन बसले होते. हिच्या मनात आता पुढे काय घडणार, याची उत्कंठा निर्र्मानण झाली.तिच्या पायाला लागलेली ठेच तिला आता जरा सुसह्य वाटायला लागली. ती उत्सुकतेनं पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी अधीर झाली. आपल्याला तहान लागलेली होती याचाही तिला विसर पडला.त्या कुडमुड्या ज्योतिषाचा हात बघण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा तास आता संपला होता. आता त्यानं आपला मोर्चा पिंजर्यााकडे वळवला.ती अधिक सतर्क होऊन बघत राहिली.त्यानं पिंजर्या.चं दार उघडलं. पिंजर्यायवर टिचक्या मारत त्या पोपटाला बाहेर यायचं जणू निमंत्रणच दिलं. तो पोपट सराइतासारखा बाहेर आला.त्यानं इकडे तिकडे माना वेळावत मग आपली चाल त्या कार्डांच्या दिशेनं चालली. आता त्या शुक मुनींनी बर्याेच विचाराअंती एक कार्ड उचलून त्या ज्योतिषाच्या हाती दिले शुकमहाराजांच्या या कामगिरी वर सारेच खूष झाले ! इतके झाल्यावर शुक महाराज परत आपल्या गढीत म्हणजे पिंजर्यारत ध्यानस्थ जाऊन बसले...ते कार्ड त्या ज्योतिषानं त्या दोघांना समजावून सांगितले. त्या दोघांनाही मग‘ खुल जा सिम सिम’ सारखे भविष्याचे दार उघडल्या सारखे वाटले असावे. त्यांच्या अज्ञाताच्या गुहेत झाकून बघताना त्यांना काही चांगले गवसले असावे, कारण त्यांच्या चेहेर्यातवरचा तो आनंद चक्कवाचता येत होता...

हे बघून आता ती ही उद्दीपित झाली होती. तिला वाटले चपटी नसली तरी काय झालं, या ज्योतिषाकडून आपल्याला आपल्या भविष्यात डोकावण्याची संधी मिळेल ती आपण घ्यावी का? ते अशुभ घुबड आपल्याला परत परत दिसतं आहे,याचा संकेत काय? याचं तरी उत्तर आपल्याला मिळू शकेल. आपलं मन जरा निवेल तरी.तिनं मनाचा हिय्या केला आणि ती त्याच्या समोर जाऊन बसली देखील. कशी जाऊन बसली ते तिचं तिलाच कळलं नाही... खरं तर ती काही अगदी सामान्य घरातून आलेली नव्हती. तिच्या सार‘या शिकल्या सवरलेल्या मुलीनं भर रहदारीच्या रस्त्यात असं फतकल मारून बसणं,जरा विचित्रच होतं. पण तरीही तिला बसावंसं वाटलं. मनातल्या अस्वस्थतेनं तिला तसं करण्यास भाग पाडलं. आपण कोण आहोत,कुठल्या घरातल्या आहोत,आपल्याला असं बसणं शोभेल का? हा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. तिच्या चेहेर्या्वरचे भाव बघून ज्योतिषालाही समजायला वेळ लागला नसावा की सावज आपल्या हातात यायला मुळीच वेळ लागणार नाही. तो औत्सुक्यानं पुढं सरकला. भविष्यात डोकावण्यासाठी तिनं उतावळेपणानं आपला हात त्याच्या समोर धरला. त्यानं आपल्या उपरण्यानं तिचा हात पुसून घेतला आणि म्हणाला, ‘ताई! बाय माझी ,का एवढा थरकाप उडालाय जिवाचा? जीव थार्या वर नाही तुझा माय ...हाताच्या रेषा बोलतायत ना माझ्याशी. काय दिसतं तुला सारखं सारखं? घुबड दिसतं तुला?चिचेची फांदी हलती का? त्यावर घुबड येऊन बसतं का?’ ती चकितच झाली. या ज्योतिषाला हे कसं कळलं? म्हणजे हा खरंच त्रिकाल ज्ञानी आहे की काय? तिनं आपला हात आता त्याच्यावर विश्वासत आणखीन जरा पुढे केला... तो तिला विचारू लागला, ‘तू इथे कशाला आली मला कळले. मनात अस्वस्थतेचा डोंब उसळलाय ना तुझ्या? या पिंजर्याततल्या पोपटासारखी अवस्था झाली आहे ना तुझी? हं..हातच सांगतोय तुझा. सक्तीचा संसार लाग लाय तुझ्या मागे खरं ना? मन रमेना तुझं संसारात..पिंजर्या.त बसली आहेस राघू होऊन.’ तिला वाटलं अरे बापरे! म्हणजे हा तर मनकवडाही निघाला. इतकं कसं सारं बरोब्बर ओळखतो आहे हा? ... तिनं विचारलं,‘ हो... पण या संसाराच्या पिंजर्यालतून सुटका? होईल सुटका माझी?’ तो मिशीत हसला. म्हणाला,‘ बघू यात ना! आमचे महाराज काय म्हणतात ते! आपल्या हाती काय असतंय! आपण ‘कालके बंदे’! ’त्यानं पिंजर्या वर टिचकी मारली. पिंजर्‍याचं दार उघडलं. शुक महाराज पिंजर्याकतून बाहेर आले. तिथे ठेवलेल्या कार्र्डजसकडे पावलं टाकत गेले. एक कार्ड त्या पोपटानं उचललं आणि त्या ज्योतिषाला द्यायच्या ऐवजी तिच्याच हातात दिलं. तो ज्योतिषी ही चक्रावून गेला. इतके दिवस तो हा भविष्य कथनाचा खेळ मांडून बसला होता, पण असं कधीच घडलं नव्हतं. कार्ड नेमकं ज्योतिषाकडेच दिलं जाई. ती देखील दचकली. कार्डावरचा मजकूर आता वाचावा की नाही या संभ‘मात असतानाच तिच्या डोक्यावरची झाडाची फांदी विचित्र हलली. ती भांबावून गेली.. अरे बापरे! म्हणजे आता घुबडही येणार का काय? तिचं मन चरकलं. अगदी अनाहूतपणे तिनं कार्डावरच्या मजकुरावर नजर टाकली. त्यावर लिहिलं होतं, ‘शक्य तितक्या लवकर इथून पळ काढा. काहीतरी अघटित घडणार आहे. तुम्ही त्यात सापडण्याची शक्यता आहे. तुमच्याही बाबतीत काहीतरी अघटित घडणार आहे. तुम्हाला सहा महिन्यांनी मृत्युयोग आहे.’ हे काय विचित्र लिहिलंय इथं? खरंच असं होईल?.... झाडाच्या फांदीवर कसलातरी विचित्र आवाज झाला. आणि ते घुबड फांदीवर येऊन बसलं..आता मात्र ती संपूर्ण घामानं निथळून निघाली. क्षणाचाही विचार न करता तिनं तिथून धूम ठोकली. घरी येऊन तिनं आधी आपल्या खोलीतली ‘ती’ खिडकी लावून घेतली. टेबलावरच्या वाळूच्या घड्टाळाकडे तिचं लक्ष गेलं तर त्यातली वाळू संपूर्णपणे ओघळून गेली होती... --------------------------------------------------------------------

(शेवट 1)

त्यानंतर ती मोजून सहा महिने आला दिवस कसाबसा ढकलत भीतीच्या ओझ्याखाली दडपत दडपतच कशीतरी तग धरून जगली. सहाव्या महिन्याच्या शेवटच्या रात्री तर तिची अवस्था अत्यंत शोचनीय होती. तिला वाटत होतं दैवानं आपल्याला सहा महिने जीवन दान दिलं. आजची शेवटची रात्र...

आता काळ कधीही आपल्यावर झडप घालेल. भीतीने तिला ग्लानी आल्यासारखं झालं. तिचा डोळा कधी लागला आणि ती गाढ निद्रेच्या कधी आधीन झाली तिला कळलंच नाही... दिवस उजाडला. पक्ष्यांच्या मधुर किल बिलाटानं तिला जाग आली. म्हणजे आपण अजून जिवंत आहोत तर! तिला आश्चर्याचा धक्का बसला. परत एकदा खात्री करून घेण्यासाठी तिनं स्वत:ला एक चिमटा काढून बघितला. आपण जिवंत आहोत याची तिला खात्री पटली. --------------------------------------------------------------------

माझ्यातला मी – Vinamra Bhabhal

$
0
0

विनम्र भाबल-एक चांगली जाण असलेला नट...वाचन वेडाचा संचालक...सुंदर कथा घेऊन आला आहे.

माझ्यातला मी – विनम्र आनंद बाभल

ह्याचं चित्त एकाग्र झालं आणि एक माणूस जिवंत झाला. नुसता जिवंत नाही तर जिवंत होऊन त्याच्यातून बाहेर पडला. म्हणजे व्हायचं असं, त्याच्या हाताची अंगठ्याच्या बाजूची दोन बोटं अचानक जमीनीवर चालू लागायची. करंगळी आणि बाजूचं बोट दुमडलं जायच आणि अंगठा त्याचा एक हात होऊन जायचा. असा त्याचा तो मनगटाखालचा हात एक माणूसचं होऊन जायचा. मग तो माणूस चालायचा, फिरायचा, पाण्यात मनसोक्त डुंबायचा, त्याला पोहता येत होतं ना. तो ते ते सगळ करायचा जे जे ह्याला करता यायचं नाही. तो काय नाही करायचा ? तो आडव्या भिंतीवरून धावायचा. हा जेव्हा बिल्डिंगच्या पायऱ्या उतरायचा तेव्हा तो माणूस कठड्यावरून घसरगुंडीसारखा घरंगळत खाली उतरायचा. मग ह्याला आपणच घसरगुंडीवर बसल्याचा आनंद मिळायचा. ट्रेनच्या खिडकीजवळ जेव्हा हा उभा रहायचा तेव्हा त्या खिडकीवर असलेला ट्रेनचा ट्रॅक म्हणजे दोन आडव्या पट्ट्या त्याच्यातला माणसाला ट्रेन होऊन खिडकीबाहेरच्या ट्रेनसोबत शर्यत लावायला उत्स्फुर्द करायच्या. पण तेव्हाच मागून घरातले टपली मारून ह्याला तस करण्यापासून रोखायचे. म्हणजे त्या जागी लोकं थुकतात, हात ठेवू नकोस अस सांगायचे. पण ह्याने कधी कुणाला थुकताना पाहिलं नव्हतं. तसे लाल डाग असायचे त्या पट्ट्यांवर पण ते सुकलेलं होतं त्यामुळे ह्याला काही फरक पडायचा नाही.

पण तो माणूस काही शांत बसायचा नाही. कधीही कुठेही जिवंत व्हायचा आणि त्याचा प्रवास सुरू करायचा. ह्याला स्वतःला त्या माणसाचं कौतूक वाटायचं. किती मज्जा आहे ना त्या माणसाची. त्याला हवं ते करता येतं. ह्याला स्वतःला मात्र साधं घराबाहेर पडायचं तरी परवानगी लागायची. केव्हा एकदा त्या माणसाएवढं मोठ होतो अस व्हायचं ह्याला.

त्यादिवशी पण असचं झालं. तो संडासला बसला आणि पुढच्या दोन एक मिनिटातचं तो माणूस जिवंत झाला. मग तो भरल्या चिंपाटाच्या कडेवरून तोल सावरत सहज चालला काय... त्यात सूर मारून पोहला काय.... ह्या सगळ्यात किती वेळ गेला कोण जाणे. त्यादिवशी एवढावेळ बसूनही दारावर थाप काही पडली नाही. हा रमतगमत घरी आला खरा पण एवढा वेळ लावला म्हणून घरी त्याला चांगलीच तडी पडली. अभ्यास चुकवायचा म्हणून त्याने उशीर केला असं घरच्यांना वाटलं. पार सुजेपर्यंत बदडून काढला ह्याला. खुप रडला. अंग तर हलू ही देत नव्हतं ह्याचं. दमला रडूनरडून. मग अचानक काय झालं कुणास ठावूक? तो माणूस पुन्हा जिवंत झाला आणि मग मात्र हा सगळ विसरला आणि त्याच्या प्रवासात सामिल झाला.

असा तो माणूस कधीही जिवंत व्हायचा. जेवताना, अभ्यास करताना, समोरचं कुणीतरी ओरडत असताना किंवा समजवून सांगत असताना, शाळेत गणिताच्या पिरियडला, बऱ्याचदा इतिहासाच्या पिरियडनंतरसुद्धा... म्हणजे त्या माणसालासुद्धा मग युद्ध करावसं वाटू लागायचं. ह्याला सख्खी भावंड, मित्र-मैत्रीणी होत्या पण हा रमायचा तो त्या माणसासोबतचं. तो माणूस बऱ्याचदा ह्याच्या पायापासून चढत चढत अंगाखांद्यावर यायचा आणि त्याच्या कानापाशी येऊन बोलायचा. ह्याचा जिवलगचं झालेला तो. ह्याने त्याला नाव नव्हतं दिलं. त्याची कधी गरजचं नाही पडली. ह्याला इच्छा झाली आणि तो आला नाही अस कधी झालचं नाही. बऱ्याचदा तर ह्याच्या नकळत तो यायचा आणि ह्याला सरप्राईज द्यायचा.

मग एक दिवस तो यायचा थांबला. कधी थांबला हे ही ह्याला कळलं नाही. ह्याची ओळख एका वेगळ्या जगाशीचं झालेली. हा सुंदर मुली पहायला, त्यांचा विचार करायला शिकला. मोठ्या माणसांसारख वागायला, बोलायला शिकला. ह्याची गरज संपली आणि तेव्हाच त्या माणसाने ह्याच्या नकळत ह्याची साथ सोडली.

आता पुन्हा त्या माणसाला जिवंत व्हायचय. पुन्हा प्रवास करायचाय. पुन्हा एकदा ते सगळ जगायचय. तो वाट पाहतोय.

शाप–योगेश शेजवलकर

$
0
0

योगेश कार्यशाळेचा दोस्त...चांगला लेखक तो होताच...चतुरंगचा सवाई लेखक...पुरुषोत्तम गाजवलेला...पण ध्यास चालूच आहे...

शाप – योगेश शेजवलकर

त्याची अपेक्षा त्याच्या डोळ्यातून दिसते...त्याची भूक चटकन लक्षात येते...स्वत:ची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड त्याच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला खोलवर अस्वस्थ करते. . इतकी अस्वस्थ, की त्यातून सुटण्यासाठी रणरणत्या उन्हात दारात आलेल्या त्या सेल्समनच्या तोंडावर आपण फटकन दार आपटतो. ते करताना त्या कुचकामी लाकडी दरवाज्यामागे आपल्या जाणीवांनाही लाथाबुक्क्या हाणत हाकलायचा प्रयत्न करतो. .

मग तावातावाने फोन उचलून वॉचमनला फोन लावतो... ‘’सेल्समनला बिल्डिंगमध्ये का सोडलस?’ असा त्याला जाब विचारतो. तो बिचारा निरुत्तर होतो ‘’माझं नाही झालं पण किमान त्याचं तरी भलं व्हावं’’ हे त्याचं वाक्य त्याच्या घशातच अडकतं हे दुर्दैव...

आणि ते बोललं गेलं नसतानाही ज्यांना ऐकू येतं त्यांच्यासाठी शाप....

नाते–सोनाली कुलकर्णी

$
0
0

नाते असे जन्माला येते....!!

नाते – सोनाली कुलकर्णी

आज अचानक पुन्हा त्याच्या मनात खळबळ माजली ...आणि ती समोर उभी होती...पण प्रेम व्यक्त करता येत नव्हतं....मनाची नुसती घालमेल सुरु झाली होती...तितक्यातच...निता सरळ अमितच्याच टेबलजवळ आली....

“अरे अमित, तू किती वाजता निघणार आहेस ऑफिसमधून? आज मला तुझी मदत हवी आहे.”

हा असा निताकडून प्रश्न आणि ती अनपेक्षितपणे समोर आल्याने तो गडबडला.

“निघेन काम संपलं की आठ वाजेपर्यंत....”

“ बरं जाताना बोलव मला आज सोबतच जाऊ”

अमितला ह्या वाक्याचा पुन्हा धक्का बसला...त्याने फक्त मान डोलावून होकार दिला...त्याच्या मनात धाकधुक सुरुच होती..कधी एकदा रात्रीचे आठ वाजतात असे त्याला झाले....काम उरकताच तो निताला म्हणाला निघायचं मॅम? (आजवर त्याने तिला कधीच एकेरी हाक मारली नव्हती...)..ती त्याची बॉस होती.

“हो झालंच आहे...”

अमित ती सोबत असूनही तिच्याच विचारात बुडालेला...त्याला हे सगळ स्वप्नवतच होतं.

ती पटकन बोलली “मला खुप भूक लागलीय.....आपल्याला इथं कुठंतरी हॉटेल आहे ना तिथं जायचं आहे. कुठं आहे माहित आहे? बघ हं, पण तुझा आजचा काही खास प्रोग्रॅम इतर कुठं असेल तर मग राहू दे....”

“नाही नाही...मॅम ,माझा काही प्लॅन वगैरे नाहीये. जाऊया आपण! अहो इथे जवळच एक ओपन स्पेस मस्त हॉटेल आहे. पण तिकडे रात्री कँडल लाईट डिनर असत. चालेल का तुम्हाला?”

“हो, का नाही,खुप आवडेल मला...”

डिनर टेबलावर सुंदर गुलाबाच फुल होतं...हळूच त्याने टेम्टेशन कॅडबरी विकत घेतलीनी बॕगमधे ठेवून दिली. ती इकडं तिकडं पहात होती. एकेठिकाणी तिची नजर स्थिरावली.

“अरे, याच्याशी माझं लग्न ठरलं आहे. हा इथेच असणार आहे आज हे समजलं होतं. म्हणलं खात्री करावी.”

अमित एकदा त्याच्याकडे नी त्याच्या टेबलावरच्या हातात हात गुंफलेल्या तिच्याकडे पहात “ओह ss” म्हणाला...

निता खुप नाराज स्वरात बोलत होती.... “मला हे लग्न नाही करायच, अमित.”

“का...काय झालं?” अमितनेही समजूनही न समजल्यासारखा खूप शांतपणे प्रश्न विचारला....

निता पटकन बोलून गेली.... “खरं सांगू आता हे लग्न तर होणारच नाही पण माझं दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे रे ...!! अजून त्याला मी बोलले नाही पण मला माहीतीय त्यालाही मी तितकीच आवडते...”

खरंतर, अमितला निता खुप आवडत असूनही....आता ही गोष्ट तिला तो कधीच सांगू शकणार नाही....ह्या विचारात तो बुडून गेला...

नितानं त्याला आपला मूड ठीक करत “शु..क शु..क अमित लक्ष कुठेय तुझ??” अशी छान साद घातली.

चटकन भान आल्यासारखं....अहं..करत..बोला ना मॅम..ऐकतोय मी...म्हणत पुन्हा निताला ऐकू लागला...

“घरचे लग्न ठरवतात म्हणून मी अशा कुणाला हो तर नाही म्हणू शकत ना....मला जे आवडत तेच मी करायला हवं ना,तुला काय वाटत रे अमित?” तिच्या प्रतिप्रश्नाने अमित अजूनच गडबडून गेला....तो काही बोलणार तितक्यातच ती त्याला म्हणाली,

“ऐक ना अमित...”

त्याने मान वर करुन हळूच तिच्याकडे पाहीलं ...

ती त्याला म्हणाली, “तू मला मॅम म्हणू नकोस. नाही आवडत मला....नितू म्हणत जा....मॅममध्ये आपलेपणा नाही रे वाटत.....आणि आपण तर आता छान मित्र आहोत, असं कोरड्या शब्दांतून नको वाटतं तुझं हाक मारण मला.”

अमितला काय बोलावं ते काहीच कळेना...पण तरीही म्हणाला “प्रयत्न करेन”

जवळपास पाचेक मिनिटात एकमतही झालं. ऑर्डर दिली.

पुन्हा त्याच विषयाकडे वळणार तितक्यातच, तिने त्याला निर्धारपूर्वक टेबलावरचे गुलाबाचे फूल दिले.....

आणि हॅपी व्हॕलेनटाईन डे म्हणाली...

अमित ....पुन्हा गोंधळला खरा..कारण त्याच्या डोक्यात तिला दुसरंच कुणीतरी आवडतंय हा विचार घोळत राहिला होता..

पण त्याच्या लक्षात आलं ... आपण विकत घेतलेल्या कॅडबरीचे.. लगेचच त्याने तिला चक्क टेम्टेशन कॅडबरी दिली ...

ती पटकन हसत म्हणाली, “टेम्टेशन? पण "फॉर लव्ह" देतात ना रे ही...?”

तो नजरेला नजर न देताच खाली बघू लागला....काय बोलावं त्याला काहीच सुचेना....

ती त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून एकटक पाहू लागली...तो म्हणाला, काय पहाताय इतकं माझ्याकडे...?

“अरे असा कसा रे तू....तुझ्या डोळ्यात जे मला दिसतय ते तू ही बघ ना, माझ्याही डोळ्यात दिसतंय का तुला..? आज valentine's day आहे...आणि मी तुझ्या सोबत आलेय.. आणि तुला काहीच वाटत नाही का?” असं म्हणत एक सुंदर valentine's day greeting त्याला दिल. शुभेच्छा पत्रा मध्ये आत लिहीले होते..

प्रिय,

मला आवडणारी दुसरी तिसरी व्यक्ती कुणी नसून तूच तर आहेस. कधीतरी तू व्यक्त होशिल असं वाटत होतं आणि म्हणूनच मी तुझी आतुरतेने वाट पहात थांबले होते...पण मला माहीतीय, तू तुला वाटलं तरी नाहीच बोलणार..कारण तू स्वतःपेक्षा माझा जास्त विचार करत असशील आज..! आणखी काही सांगायचय तुला,

नयनास या होती तुझे भास... राहिन मी तुझ्या काळजात...

खुप उशिर केलाय सांगायला पण...मी कधीची तुझ्या प्रेमात आहे रे .. I love u !!

तुझीच , '

नितू...

अमित काही क्षण नि:शब्द झाला...त्यानं तिचा हात अलगद हातात घेतला..”हो, मलाही तू खूप खूप आवडतेस! तुला माझ्या भावना कळल्या. पण मी मात्र कधी तुला गमावलं तर? मग मी त्या दुखावल्या अवस्थेत कसा राहीन या विचाराने कधीच बोललोच नाही... प्रेम अस सहज नी संपूर्ण मिळालं तर त्याला छान अर्थ येतो...

एका नविन नात्याला जन्म देऊन, अगदी आनंदाने! सहज!

त्या टेबलकडे वळूनही न पाहता.

शेवट- Supriya Bharaswadkar

$
0
0

खूप आवडली सुप्रियाची ही कथा...समृद्ध आहे...आणि शेवटी तर...चक्क भरून आल...ह्याच साठी होता अट्टाहास!!

शेवट- सुप्रिया भारस्वाडकर

खूप दिवसांनी दिसतंय हे निळंभोर आकाश, पावसाचे ढग नसलेलं. त्यावर विखुरलेले, कृष्णधवल छटा धारण केलेले ते ढगांचे पुंजके. दूरवर दिसणारी ती डोंगररांग. जणू ढगांची स्पर्धा सुरू आहे त्या शिखरांना स्पर्श करण्याची! ते निळ्या रंगाचं छत्र धारण केलेली, पावसाच्या स्पर्शाने पुलकित होऊन हिरवीगार झालेली धरणी.. काही ठिकाणी पेरणीनंतर शेतात नुकतीच उगवलेली पिकांची हवेवर डुलणारी नाजूकशी रोपं, त्यात मधेच दिसणारी काळीभोर माती, मध्येच कुठेतरी त्यांच्या यौवनात भासणारी पिकं आणि अधून मधून द्राक्षांच्या बागा.. आत्ता झालेल्या गोदामाईच्या दर्शनाने तिचं मन भरून आलं. क्षणभर वाटलं त्याच गोदेच्या पात्रात ह्या देहालाही विसर्जित करता आलं तर किती बरं होईल! अधून मधून त्या शेतांत दिसणाऱ्या छोट्या पण टुमदार घरांकडे आणि त्यातील लोकांकडे पाहिलं की तिला वाटत होतं, नक्की सुख सुख म्हणतात ते असतं तरी काय? सगळ्या सोयीसुविधा असूनही काहीतरी हरवल्यागत झालेलं आपलं आयुष्य म्हणजे सुख की दिवसभर राबून शांत झोपणारं हे आयुष्य म्हणजे सुख?

मोठया प्रयासाने मनातल्या ह्या विचारांवर ताबा मिळवून तिने पुन्हा एकदा त्या स्वतःवरच लुब्ध असलेल्या निसर्गाकडे पाहिलं.. समोर नजर टाकली तर मावळतीचे सूर्यबिंब दिसले. त्या आकाशीच्या राजाने अगदी मनमुराद त्याचे रंग उधळले होते. तांबड्या रंगाच्या सगळ्या छटांनी सभोवतीचं आकाश कसं रंगून गेलं होतं. बालकवींच्या

"तो रविकर का गोजिरवाणा, आवडला आमुच्या राणींना.. लाजलाजली ह्या वचनांनी, संधीभोळी ती फुलराणी"

ह्या ओळी आठवल्या आणि तिला अचानक तिच्याच मनावर त्या रविराजाने गारुड केल्यासारखं वाटलं! त्या मावळतीच्या सोनरंगात आख्खी सृष्टीच न्हाऊन निघाली होती. धरतीच्या हिरव्या रंगावर कोणीतरी सोनेरी रंगाची शाल पांघरल्याचा भास..हवेचा हवाहवासा वाटणारा, रोमांचित करणारा एक थंडगार झोत शरीराला स्पर्शून गेला आणि तिचं मन तिथेच त्याच्या आठवणीत हरवून गेलं. त्या आठवणींनी मन तृप्त झालं. आणि खूप वेळा मनात येऊन गेलेला विचार परत तिच्या मनात आला..

आयुष्याचा शेवट होतांना मन असेच तृप्त हवे..

कुठलीही इच्छा न उरलेले.. आनंदी.. हसरे..


पद्मालय–Asawari Deshpande

$
0
0

पद्मालय आणखी एक चित्तथरारक भाग....

पद्मालय – आसावरी देशपांडे

भाग ४

काल रात्री मनवाने आवेगाच्या भरात 'तोच' शब्द उच्चारला, त्या क्षणापासून मिहीर अस्वस्थच होता, फिकट रंग मनवाच्या खास आवडते, गुलाबी, पिस्ता, अबोली, आकाशी पण काल रात्री भळभळीत लाल रंगाची साडी, बटबटीत मेकअप, पाहिल्यावरच मिहीरला चुकल्या सारखे वाटत होते, मनवाच्या या रूपाचे फारच आश्चर्य वाटले. आज लाल डायरीने त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले, जे क्षण केवळ त्या दोघांचे होते, त्यावर आज एका तिसऱ्याच व्यक्तीचे आक्रमण झाले. काहीतरी अनर्थ होणार की काय या भीतीने मिहीर विचारात गढला. पण अस्वस्थता अधिकच वाढली, मनावरचे दडपण मनवा जवळ बोलू शकत नव्हता. विचित्र कोंडीत तो अडकला. त्या बिचारीला तर त्यांच्यात काही वावगं घडले याची पण कल्पना नव्हती.

डायरी मधला पहिल्या पानावरचा मजकूर ....

प्रिय कबीर

यास,

प्रेमळ भेट...

"तुझा मृत्यू मला तुझ्यापासून वेगळे नाही करू शकत, कारण तुझा आत्मा सदैव माझ्या सोबतच आहे, प्रत्येक डायरी गणिक एक नविन शरीर तुला मिळेल... कधीही न संपणारी प्रेमकथा....(२२ जून १९७० पासून .... अनेकदा नव्याने जन्म घेणारी तुझीच फक्त तुझीच नैना....

डायरीचे दुसरे पान....

"खूप वाट पाहायला लावलीस. आतापर्यंत दोन जोडपी येऊन गेली..सगळं कसं मी आखल्याप्रमाणेच पार पडलं...तुम्ही तिसरं जोडपं आहात दहा वर्षांनी इथे आलात.... अनेक रहस्य 'पद्मालयात' दडलेली आहेत,प्रत्येक रहस्यागणिक तुला किंमत मोजावी लागेल, खेळ तर सुरु झाला आहे पाहू आता 'तू स्वतःला हरवून जिंकणार,कि स्वतःला टिकवून हरणार,की तू देखील सर्वस्व हरवून, मोक्षासाठी वाट बघणार एका नव्या जोडप्याची... मला वाटलंच तू आपणहून इथपर्यंत येशील, फार गोंधळ झाला असेल तुझ्या मनाचा...पण आता यापुढे जे जे होईल ते फक्त माझ्या मर्जीने, तुम्ही दोघे जण माझ्यासाठी कळसूत्री बाहुल्या आहात...आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाकडून मी माझ्या इच्छा पूर्ण करून घेते....आता यातून सुटका होणे नाही..... इथल्या प्रत्येक कणाकणात माझे अस्तित्व आहे."

मिहीर मनाशीच पुटपुटला 'कबीर'...हाच तो शब्द मनवाच्या तोंडून निघालेला ...म्हणजे देह मनवाचा आणि आत्मा 'नैना' चा....खरच असं घडू शकत का? कालचे मनवाचे वागणे अनैसर्गिकच होते. क्षणिक सुखासाठी नैनाने मनवाचा ताबा घेतला असावा, "अरे ,काय फालतुगिरी आहे ही" मिहीर चे एक मन यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते, कारण प्रत्येक उदाहरणाला, चमत्काराला विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेणारा मिहीर भूताखेतांवर विश्वास ठेवणे दूरच.... पण त्याचे दूसरे मन भीतीने करपून गेले... खोलीत त्याला कोणाचीतरी हालचाल जाणवत होती, काल रात्रीही ही जाणीव झाली .. यापुढे वर जायचेच नाही असा मनोमन निर्णय मिहीरने घेतला..

त्यादिवशी डॉक्टरांनी केलेला उपदेश मिहीर विसरला नव्हता. त्यांचे बोल त्याच्या कानात घुमू लागले,"मिस्टर मिहीर तुमच्या मिसेस ना या घराची 'ओढ' वाटण्या आधी या घरापासून दूर जा नाहीतर अनर्थ ओढवेल..."

सकाळी सकाळी मनवा गुणगुणत झाडांना पाणी टाकत होती, मिहीर बाहेर आलेला दिसताच लगबगीने त्याच्या जवळ गेली,

"मिहीर, इथून थोड्या अंतरावर एक तळं आहे, शारदा सांगत होती,खूप कमळं फुलली आहेत,जाऊ या का?"

(खूप विचार करून मिहीर म्हणाला)

" मनवा,ठीक आहे जाऊ या,पण एका अटीवर, त्या जिन्यावरच्या खोलीत जाण्याचा हट्ट तू सोडायचा,"

“बरं, सोडला हट्ट, झालं समाधान...” मनवा

'पदमालय' ची भव्यता प्रवेशद्वारावरुन झळकायची, चुम्बका सारखे ओढले गेले मी या घराकड़े. आज आठवडा झाला पण बंगल्यातील कितीतरी कोपरे माझ्यासाठी अज्ञातच आहेत. मागच्या बाजूला असलेले चिंचेचे झाड मुकाट उभे होते, त्याच्या बुंध्याशी पाण्याची तीन वेटोळी दिसली, नुकतेच शारदा ने पाणी टाकले असावे, असे वाटले,

"शारदा तू अशी झाडाला पाणी टाकताना खेळत बसलीस तर कामं कशी आवरतील तुझी?"

"न्हाय जी म्या न्हाय पानी घातलं, आन त्यात ह्यो चिचचं झाड, लय वंगाळ, तुमी सायबासनी सांगून त्यवढं उपटून टाका बरं!"

"शारदा काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस, अगं आज साहेब लवकर उठलेत, त्यांनीच टाकलं असेल पाणी,"

"काय बी म्हना तुमी मनवा ताय, आमी अडानी मानसं, तुम्हास्नी नाय कळायचं, या झाडावर भुतं रायतात."

शारदाला 'भूत' या विषयाबद्दल अगाध ज्ञान होतं, मधून मधून ती भुताच्या गोष्टी सांगायची, तिचा भाबडा विश्वास, देवावरची श्रद्धा, वागण्यातला खरेपणा खूप आवडायचा मला.

अचानक नजर अडगळीतल्या कोपऱ्याकडे गेली. कमळाच्या आकाराचे तुळशी वृंदावन एका बाजूला दिसले, तुळशीवृंदावन पाहताच मन भूतकाळाकडे धावू लागले, 'आई' ईश्वराची परमभक्त, अपार श्रद्धा असणारी त्याउलट वडील नास्तिक, देवघर आणि कमळाच्या आकाराचे तुळशीवृंदावन ही दोन्ही ठिकाणे आईसाठी 'काशी आणि प्रयाग'हून कमी नव्हती. कित्येकदा वृंदावनासमोर मी तिचे भरलेले डोळे पाहिलेत, त्या वयात याचा अर्थ कळायचा नाही, पण हळूहळू वाढत्या वयानुसार तिच्या पाणावलेल्या डोळ्यांचा अर्थ कळू लागला, तिची भक्ती तिला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवायची, संकटाची भीती, खचणं, शोक, त्रागा या गोष्टी मी कधीच तिच्या ठायी पाहिल्या नाही. तिची श्रद्धा तिला खूप कणखर पणा द्यायची.

"इतक्या पवित्र वृंदावनाची जागा खरं तर घराच्या दर्शनी भागातच आहे" हा विचार मनाला शिवला.

शारदाच्या मदतीने ते वृंदावन घरासमोर अंगणात ठेवले, तुळशीचं नवीन छोटसं रोपटं त्यात लावलं, पाणी घातलं, दिवा लावला, नकळत हात जोडले गेले...

" शुभंकरोती कल्याणम,आरोग्यम धनसंपदा शत्रूबुद्धी विनाशाय, दीपक ज्योती नमोस्तुते"

आता या वृंदावनाजवळ आईचं 'अस्तित्व' जाणवू लागलं, मनाला खूप शांतता मिळाली,मनावरचं दडपण दूर झाल्यासारखे वाटत होतं,. या बंगल्याकडे खेचून आणणारा, जोडून ठेवणारा हाच दुवा असेल का?

उंबरठा ओलांडून घरात शिरताच सारे काही बदलले होते, खिडक्यांच्या काचा एकमेकांवर आदळत होत्या, वाऱ्याचे भेसूर रूप पाहून छातीतली धडधड अजूनच वाढली. सारं घर वाऱ्याने झोडपून निघालं होतं, घरात कोंदट आणि कुबट वासाने श्वास घेणे असह्य झाले, आता त्या वासाने रौद्र रूप धारण केले, नेमके लाईट पण गेले, दुष्काळात तेरावा महिना, मिट्ट काळोखात मी चाचपडत होते, शारदाला आवाज दिला पण काहीच प्रतिसाद नाही आला, शेवटी न राहून मोबाईलच्या मिणमिणत्या उजेडात मी किचनच्या दिशेने जाऊ लागले... पाच पावलांवर असणारे किचन पाच...दहा....पंधरा... वीस...पन्नास .. पावले झाली तरीही काही येईना.. घामाच्या धारा वाहू लागल्या, कुबट वासाने डोळे चुरचुरले, मी थकून जमिनीवर अंग झोकून दिले, डोळे उघडून समोर पहाते तर काय चक्राकार जिना उजळून निघाला आणि बेडरूमच्या दाराची जोरजोरात उघडझाप सुरु होती, इतक्या भयाण शांततेत दाराच्या फाट फाट आवाजाने पोटात खोल खड्डा पडत असल्यासारखे जाणवले, ज्या दाराला मिहीरने कुलूप लावले तेच ते दार ....

तिचे काळीज धडधडायला लागलं, तिच्या श्वासाच्या आवाजाने देखील तिला भीती वाटू लागली.

सर्रकन वेगाने पायाला मुंग्या आल्या, अगतिकतेने ती जमिनीवरच आपला आधार शोधू लागली, त्यादिवशी जिन्यावर ती अशाच अनुभवाने पछाडली होती, आज त्याचीच पुनरावृत्ती अधिक ताकदीने झाली. पण फरक फक्त इतकाच होता आता तिला या वरच्या बेडरूमची ओढ वाटू लागली.. तिला कोणीतरी हाक मारत होतं "मनवा,अगं मनवा ये वर" आजपर्यंत इतका मंजूळ आवाज आणि आवाजातली मार्दवता तीने कधीच अनुभवली नव्हती. ती आवाजाच्या दिशेने पाहू लागली......आता दार शांत झालं..

कदाचित वादळापूर्वीची ती शांतता असेल का?

जिस्म–उम्या कांबळे

$
0
0

तीन ओळींचा संवाद आहे...पण त्यातून दिसणारे समाजजीवन भयाण आहे..असे हातोडीचे फटके डोक्यात बसायलाच हवेत....

जिस्म – उम्या कांबळे

क्यों रे नौशाद आज गया नही क्या ??? .....शाखेपे...? क्या हुवा पैसा नही मिला क्या ...?? लाथ मारी क्या शर्माने ..?

तेरेको क्या करना रे रंडी ...???

अबे हम तो जिसम बेचते है रे ...तेरे जैसा ईमान नय...चल फुट ...तेरे शर्माको नंगा देखी मै .....ये छोटु ...ऐक पेशल भेज उपर ....

उर्मिला–आरती जोशी

$
0
0

आरती जोशी - क्या बात है! पुराणाचा आधार घेत कथा सुरु होते...आणि आजवर कधी येऊन ठाकते कळतच नाही...!!

उर्मिला – आरती जोशी

उर्मिला ....लक्ष्मणाची अर्धांगिनी....पती हाच परमेश्वर आणि त्याची व त्याच्या कुटुंबियांची सेवा हाच स्त्रीधर्म असे मनात घोकूनच तिने महालात प्रवेश केला. सीता आणि उर्मिला सख्या बहिणी.....राम आणि लक्ष्मणासोबत त्यान्च्या त्यांच्या नवीन आयुष्याची सुरवात झाली....

सीतेसाठी तिचा पतीचं सर्वस्व होत....पण उर्मिलेसाठी पतीबतोबरच पतीला प्रिय असणारी प्रत्येक गोष्ट महत्वाची होती.

एक दिवस अचानक तिला कळलं की रामाला १४ वर्षांसाठी वनवासाला जावं लागतं आहे आणि त्यांच्याबरोबरच सीता व लक्ष्मणाने पण जायचे ठरवले आहे. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता....तिनेही ठरवलं की आपणही त्यांच्या सोबत जायचं...

पण नंतर विचार केल्यावर तिच्या लक्षात आले की सगळेच वनवासाला गेले तर लक्ष्मणाच्या आप्तेष्ठांची, राज्याची(जे त्याला प्राणप्रिय होते) त्याची काळजी कोण घेणार....?

तिने वनवासाला न जाण्याचा निश्चय केला.... डोळ्यातून दोन मोती निखळले.... तिचा वनवास 'फक्त' १४ वर्षात संपणार होता..... तिने अजून काहीतरी ठरवलं.....डोळ्यातले ते मोती सौभाग्यालांकर म्हुणून जपून ठेवत तिने डोळे कोरडे केले....सगळा नववधू सारखा साजशृंगार करून ती लक्ष्मण यायची वाट बघू लागली.

लक्ष्मण तिथे आल्यावर उर्मिलेच हे रूप बघून अचंभीत झाला....संतापला....आम्ही वनवासाला जात असताना तुला साजशृंगार सुचतो आहे...मला तर वाटलं होतं तू माझ्यासोबत येण्याचा हट्ट करशील....पण तू माझा भ्रमनिरास केलास...

उर्मिला त्यावर म्हणाली हा साजशृंगार हेच माझे जीवन आहे.... तो सोडून मी तुमच्या बरोबर कदापी येऊ शकत नाही.... हे ऐकून लक्ष्मण खूप दुःखी झाला ...'आता या पुढील जीवन रामाच्या चरणी अर्पण करायचे' हा दृढ निश्चय करूनच तो तिथून निघाला..

उर्मीलाला हेच तर हवं होत...आनंद आणि दुःख अशा दोन्ही संमिश्र भावना डोळ्यातून वाहून गेल्या....सावकाश तिने सगळे भरजरी वस्त्र उतरवले....एका वस्त्रनिशी ती तिच्या पुढच्या आयुष्याला प्रारंभ करणार होती...आता कुठें तिच्या वनवासाची खरी सुरवात झाली...

खरतर जशी पतिव्रता सीता होती तशीच उर्मिलापण होती....पण सीतेला मिळाला तो पती सहवास आणि उर्मीलाला मात्र विरह....त्या १४ वर्षांसाठी तिने पतीच्या मनातल्या तिच्या जागेलाही ओरबाडून बाहेर काढले होते...फक्त त्याचा निश्चय डळमळीत होऊ नये म्हणून....मग खरा वनवास कोणी भोगला सीतेने की उर्मिलेने???? उर्मीलाला एक प्रश्न आयुष्यभर छळत राहिला....'का लक्ष्मणाने तिच्यावर विश्वास दाखवला नाही??? का तो अस म्हणाला नाही की माझी उर्मिला अशी नाही?' तिने जे दाखवलं तेच त्याने बघितलं..का तो तीतिच मन वाचू शकला नाही????

१४ वर्ष नंतर सीतेला एका अग्निपरीक्षेला सामोरी जावे लागलें म्हुणून लोकांनी आज तिचे देऊळ बांधले....पण या अश्या कित्येक अग्निपरीक्षा रोज झेलणाऱ्या उर्मिलेच मात्र एकही देऊळ नाही....की अजून धरणी मातेने तिला तिच्यात सामावून घेतले नाही...

ती उर्मिला अजूनही उपेक्षित...प्रत्येक घराघरात...एक 'सामान्य' स्त्री बनून...प्रत्येक दुःख, अन्याय हसत झेलून उभी आहे त्याच माणसांचं कवच बनून...न थांबता...न थकता...तिने घेतलेले अविरत व्रत ती अजूनही पाळते आहे....पुढच्या पिढीला तिचा वसा देऊन... कारण अजूनही तिचा वनवास संपवायला ना कुठला राम आलाय ना लक्ष्मण.... प्रत्येक पिढीतली ही 'उर्मिला' मात्र खंबीर होत चालली आहे... आयुष्यातली प्रत्येक लढाई लढायला तिला आता कुठल्याही लक्ष्मणाची गरज उरली नाही...

स्वतःचा उद्धार करायला तिला आता 'राम-लक्ष्मणच्या ' देवळात जावं लागतं नाही.....

एकटी–अर्चना हरीश

$
0
0

हा माझा मार्ग एकला...ह्या गीताची तीव्र आठवण झाली.

एकटी – अर्चना हरीश

काही चेहरे रोज दिसले कि ओळखीचे होतात. अश्याच एक गोऱ्या आजीबाई, त्यांच्या तरुणपणी त्या खूप सुंदर असणार. खरेतर , आत्ताही त्या खूप सुंदर दिसतात. कधी सुपर स्टोर मध्ये , कधी लायब्ररी मध्ये, कधी कॉफीशॉप मध्ये बऱ्याच वेळा दिसतात. पण त्यांचे अगदी १००% भेटण्याचे ठिकाण म्हणजे बदकांच्या तळयाकाठाचा बेंच. रोज सकाळी त्या तिथे पुस्तक वाचत बसलेल्या असतात.

क्रिसमसच्या आधीचे काही दिवस वादळी हवेचे होते, सामानाने भरलेल्या ट्रोलीज सुद्धा हवेने इकडे तिकडे जात होत्या. लहान मुले आणि मोठे लोक भिंतीच्या आधाराने किंवा एकमेकांना पकडून चालत होते. तश्यात या आजीबाई काही समान घेऊन दुकानातून बाहेर पडल्या. बस स्टोप पर्यंतच्या रस्त्यावर काही अंतराने झाडी होती . पण एका झाडा पासून दुसऱ्या झाडा पर्यंतचे अंतर एवढ्या हवेत झोक जाऊ न देत पार करणे त्यांच्यासाठी अवघड होते.

मी मदत केलेली त्यांना आवडेल की नाही हा विचार चालू असतानाच माझा हात पुढे गेला. त्यांनीही गोड हसत त्यांचा थरथरता हात माझ्या हातात दिला आणि आम्ही चालू लागलो. साधारण 150 फुटाचे अंतर. पहिल्यांदाच आम्ही एकमेकांशी बोललो, बोचणारी थंडी, आणि नकोशा हिवाळ्याबद्दल. बस स्टोपवर पोहोचल्यावर मला म्हणाल्या 'माझा क्रिसमस या वेळी छान जाईल, तू ही तुझ्या घरच्यांसोबत आनंदाने साजरा कर'. मी त्यांना तशाच शुभेच्छा दिल्या. त्यावर त्या म्हणाल्या, ' मी एकटीच असते, कुटुंबात कोणी नाहीये माझ्या!' तेवढ्यात बस आली आणि त्या निघून गेल्या.

तिकडून घरापर्यंत येताना त्यांचे सगळीकडे एकटे असणे दिसले ,खुपले!! रस्त्या पलीकडचा तळया काठाचा तो बेंच ही एकटा वाटला. विचार आला, सगळेच एक एकटे असतो आपण, दूर देशात अनोळखी लोकांमध्ये ओळखीचे चेहरे शोधतो. स्वतःच्या देश्यात ओळखीचे लोक आणि नाती सोबत असल्याचे भास असतात. दगड मातीने बनलेले निर्जीव घर सोबत करते , ऊब देते पण त्या घरात राहणारा प्रत्येकजण एकटाच असतो!!

कर्ती–अज्ञा पाटील

$
0
0

काय उत्तर आहे अज्ञाच्या प्रश्नाचे?

कर्ती – अज्ञा पाटील

आज एक मोठा यज्ञ सुरु होता. दुष्काळ निवारावा म्हणून; तसा हा यज्ञ दोन वर्षे झाले सुरूच होता.

पंधरा दिवसाला तिचा नवराही या यज्ञात आहुती म्हणून गेला, संपवलं त्यानं स्वतःला. तिलाही स्वतःला संपवावे असे वाटत होते पण काखोटीला असलेलं, बोलही न फुटलेलं लेकरू दिसत होतं.

ती तशीच दुःखाच्या अन कष्टाच्या यज्ञात समिधा म्हणून ती जगत राहिली. नंतर निवारेल दुष्काळ, धरा पुन्हा प्रसवेल, पण तेव्हा कष्टाचा यज्ञ सुरूच राहील, दुःखाची तीव्रता कमी होईल पण वैधव्य पाठ सोडेल?

म्हणजे हिने समिधा म्हणून आयुष्यभर जळत राहायचं का? तरीही तिला “कर्ती” चा दर्जा मिळेल की मुलाकडे दिराकडे किंवा भावाकडे त्यांच्या शब्दात जगावं लागेल

अप्रूप–नवनाथ भोरडे

$
0
0

कथा जितकी साधी सरळ तितकी ती आत जाऊन भिडते....क्लिष्ट कशाला करायची?

अप्रूप – नवनाथ भोरडे

आज सकाळपासुन तिची मनःस्थिती नीट नव्हती. सतत घरातल्या प्रत्येकावर चिडत होती. तिला आज घरातली गर्दी नकोशी वाटत होती. सतत तिला एकांत हवा असायचा. त्यासाठी ती घरासमोरच्या बागेत तासानतास बसायची. आजही तिने तेच केल, पण आज तिला ती बाग मोहक वाटतच नव्हती. त्या बागेच सौदर्य तिच्या कोमजलेल्या मनावर काहीच परिणाम करत नव्हत. लहानपणी तिनेच लावलेली झाडे एव्हाना मोठी झाली होती. पण त्या झाडाची सावलीही तिला रखरखत्या उन्हासारखी जाणवत होती. तिला सतत राहून राहून समोरच्या जुन्या विहरित स्वतःला ढकलून मनाची चलबिचल संपवावीशी वाटत होती. मनावर झालेला कुरूपतेचा घाव नकोसा वाटत होता.

सतत तिला आपल्या सावळ्या रंगाची चीड येत होती.

"थोडीशी उजाळली असती तर आम्हाला तोंडघाशी पाडल नसत" आईच हे वाक्य तिला कानात तेल ओतल्यासारख वाटायच. पण ह्या सगळ्यात माझी काय चूक ती रडत रडत मनाला विचारायची. ती मनाला सतत समजावायची, एकांतात रडायची. राहून राहून तिला आपल्या कुरुपतेची किव यायची .

"एवढी कुरूप होते तर लहानपणीच का नाही मारल?" तिच्या आईवर राग दाखवत ती स्वतःशी बोलायची. लहानपणी वाटणारा तिचा निरागस चेहरा जसजसा तारुण्यात यावा तसा खितपत पडल्यासारखा वाटू लागला. त्या सावळ्या रंगावरचा आलेला पांढरा व्रण तिला चराचरा कापावसा वाटत होता. तिच्या चेहऱ्याचा तिला राग यायचा. कितीही सजायचा प्रयत्न केला तरी तिच सौंदर्य तिचा हिरमोड करायच. काही काळानंतर तिला एकांत जवळ वाटू लागला.

लग्नाला येणारे नकार तिला अजून त्रास देऊ लागले. वय मात्र वाढत चालल होत. चेहऱ्यावरच तेज मात्र हळु हळु कमी होत चालल होत. लग्नाची संसाराची स्वप्नं धुसुर होऊ लागली. घरच्यांसह तिनेही आता लग्नाची आशा सोडली. स्वप्नातला राजकुमार कदाचित आपल्या नशिबात नाही अस ती मनाला समजावत होती. मन रमवण्यासाठी कुठं बाहेर गेल की खर तर काळजीने की मुद्दाम लोक तिच्या लग्नाचा विषय काढत. अचानक निघालेल्या मनाच्या जखमेची खपली जरा जास्तच वेदना द्यायची. मग तिथेही तिच तोंड पडायच. आता ती पूर्णवेळ घरातच राहू लागली. दिवस सरत होते तशी तिची खपली पुन्हा भरून यायची पण चिघळलेल्या रक्ताच व्रण मात्र तसाच असायचा.

कधी कधी देवांवर खूप चीडायाची "सगळ्यांची जोड़ी तूच ठरवतोस तर माझी पाटी कोरी का?" आता मात्र तिशी पार केल्यावर आपल्यात तारुण्याच राहील नाही अस तिला वाटू लागल.

एक दिवस मात्र एक ग्रुहस्थ असेल पस्तीस चाळीशीतले तिच्या वडीलाबरोबर घरी आले. घरच्यांनी त्यांना चहापाणी करून बाहेरच्या खोलीतच बसवल. एव्हाना ती व्यक्ती कशासाठी आली आहे ह्याचा अंदाज आला होता. आपल्याला शेवटचे पाहुणे कधी पहायला आलते तेही विसरली होती. तिला घरच्यांनी साडी घालून आवरायला सांगितल. तोंड धुवून ती आरशासमोर उभी होती चेहऱ्यावरचा एक एक थेंब पुसत आज तरी माझ सौंदर्य खुलव अशी साद जणू ती आरशाला घालत होती.

तिने ठरवल आज आपण खोट्या आणि तात्पुरता विकत घेतलेल्या सौंदर्याची झालर न वापरता निसर्गाने वाढून दिलेल्या भावनिक मनाचा सौंदर्य मांडायच. त्या प्रमाणे ती साडी आणि फक्त केस नीट विंचारुन आली. वडील आणि त्याचा गप्पा सुरू होत्या. ती मात्र शांत बसली होती. अधून मधून त्याच्याकड पहायचा प्रयत्न कारायची. तसा तो वरकरणी शांत स्वभावाचा वाटत होता. पण वय मात्र लपुन राहत नव्हत. बोलणी झाल्यावर परत घरी निघून गेला. कळवतो थोड्याच दिवसात वडीलां जवळ निरोप दिला.

"आलाच होता कशाला?" ती त्याच्यावर चिडून बोलत होती. आज मात्र पहिल्यांदाच परक्या माणसावर हक्काने चिडल्यासारख वाटत होत. ती मनातल्या मनात हसली. दिवस जात होते मुलाचा निरोप काही येत नव्हता. ह्याचा पण नकार आहे हे ती समजून गेली.

एक दिवस मात्र मुलाचा निरोप आला, मुलगी पसंद आहे. असा निरोप ऐकताच तिच्यासाठी तिच आयुष्य क्षणभर तिथच थांबाव की काय वाटू लागल. कितीतरी वर्ष ह्याची ती वाट पाहत होती. पण मनात मात्र एक भीती होती. तिला राहून राहून त्याच गोष्टीची चिंता वाटायची ह्या कुरूप चेहऱ्यावर तो कितपत प्रेम करेल? का फक्त एकांत नकोसा झालाय म्हणून लग्न करतोय? ह्याच काळजीने तिचे मन ग्रासले होते. पण घरात त्याच्या चांगुलपणाचा विषय निघाला की मन मात्र हलक होत होत.

एक दिवस मुलाने तिच्याशी भेटायच ठरवल. घरच्यांनीही परवानगी दिली. घरातल वातवरण बदलल होत. तिच्याशी साध नीट न बोलणारे आज तिच्यासाठी साड्या दागिने घेत होते. त्याने घेतलेली साडी नेसल्यावर तिच्या चेहऱ्यावरच हासू लपत नव्हत. त्याच्यासमोर जायची तिला लाघवी लाज वाटू लागली. तिच्यासाठी हे पहिल्यांदाच आणि स्वप्नवत होत. आरशात पाहून ती तिच्या चेहऱ्याकड पाहत होती. "किती बदलल ना सगळ?" मनाला समजावत होती. देवाचे आभार मानत होती. ती बदलली होती तिच सगळ आयुष्य बदलल होत. नकोस वाटणार आयुष्य आत तिला हवहवस वाटत होत. ती स्वतःला खूप सजवायची पण तिच ते निखळ हसण त्या सौंदर्यापुढं फिक्क वाटत होत. आता मनातून मात्र त्याच्या भेटीची ओढ निर्माण झाली होती. आवरत असताना घरातून आईचा आवाज आला

"अग तुझ्यासाठी फोन आलाय"

ती धावतच धडपडत फोनजवळ गेली.

"अगं पडशील . . हळु . . किती घाई? फोन कुठं जात नाही" आई जरा चिडूनच बोलली .

पण एव्हाना त्याने त्या दोघीच बोलण फोन मधून ऐकलं होत. त्यालाही ते ऐकुन हसू येऊ लागल. तिने फोन कानाशी लावला. तो बोलत होता "अगं कुठंय तू? किती वेळ लागेल? मी थांबलोय वाट पाहत...लवकर ये " "आवरतेय येते थोड्याच वेळात" तिने मात्र हळु आवाजात बोलून फोन ठेवला. तिला त्याच एकेरी भाषेतल बोलण खूप भारावल. ती आज पर्यंत ह्याच सगळ्याची वाट पाहत होती. झटपट आवरुन ती त्याला भेटायला निघाली. .थोडसं अंतरही तिला आता खूप असल्यासारख वाटत होत.

ती तिथं पोहचली समोर तो उभा होता अगदी साधा फॉर्मल ड्रेस ध्ये तिचीच वाट पाहत होता. ती मात्र पाय अडखळल्या सारखी त्याच्या दिशेने जात होती. दोघेही एका हॉटेलमधे गेले. त्या दोघांनाही काय बोलावे सुचत नव्हते. दोघेही सामोरा समोर बसले होते. वेटर पाणी आणि मेनूकार्ड टेबलवर ठेऊन ऑर्डर मिळायची वाट पाहू लागला. " काय घेणार?" त्याने विचारल " काही नको" थोड्याश्या भेदरलेल्या आवाजात तिने उत्तर दिल. " काही तरी ऑर्डर दे" त्याने पुन्हा विचारल " नको मला भूक नाही" ती म्हटली नाही हो म्हणता म्हणता दोघांनीही आईस्क्रिमची ऑर्डर दिली. वेटर निघून गेल्यावर दोघेही शांत. कोणीच काही बोलत नव्हते. तिला खूप काही बोलायच होत मनातल सांगायच होत पण तीही पुर्णपणे भांबावुन गेली होती. मग सुरवात त्यानेच केली. आपल्याबद्दल सगळ सांगितल आणि तिनेही. दोघांनाही समांतर असा भूतकाळ होता. ते सगळ ऐकत असताना त्याच्याविषयी तिला जास्तच आपुलकी वाटत होती. आईस्क्रिम टेबलावर आले.

आज ती कितीतरी दिवसांनी मनसोक्त नटून आली होती तिच सजण कोणासाठी तरी होत. तो आज तिच्या समोर उभा होता. ही वेळ इथेच थांबावी पुढं सरकुच नये अस तिला वाटत होत.

आई वाट पाहत असेल म्हणून ती लवकर निघायचा प्रयत् करत होती. पण तिचा पाय तिथून लवकर निघत नव्हता त्याच्याशी आता तासनतास बोलावस वाटत होत. तेवढ्यात फोन वाजला आईचा होता. तिने हसून त्याचा निरोप घेतला. निघताना मात्र सतत मागे वळून पहायचा मोह कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी तो असफल होत होता. दोघांचीही अवस्था तिच होती. चेहऱ्यावरच हसू खुलवत तिने घरची वाट धरली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. कुरूपतेच्याहि पलीकड प्रेम असू शकत ह्याचा प्रत्यक्ष प्रत्यय तिला आज आला होता. तिला ते सगळ आवडल होत.

ती बदलली होती तिच आयुष्य बदलेल होत. तिच्यासाठी प्रेमासाठी सौंदर्याच्या कुबडाची गरज नव्हती. तिच्या कुरूपतेवरही अखंडत्व प्रेम करणारा तिचा तो मिळाला होता. प्रेमाची व्याख्या तिच्यासाठी बदलेली होती. चकचकित आभासी दुनियेत न राहता ते दोघेही वर्तमान आणि भूतकाळ ह्याची सांगड घालून आपल्या भविष्याच्या दिशेने पाऊल टाकत होते. त्याच विश्वात दोघांनीही स्वतःला न्हाऊन नेल होत. तिच्यासाठी आता ते सगळ बदलेल होत . . . . .

गावगुंड – राजेश लोंढे

$
0
0

पुन्हा एकदा साधी सरळ कथा पण आत जाऊन भिडणारी

गावगुंड – राजेश लोंढे

शामू जरी गावगुंड असला तरी लग्नानंतर सुधारला होता. मजुरीसाठी तालुक्याच्या ठिकाणी रहायला गेला होता. पण न चुकता नेमाने दरवर्षी गावच्या जत्रेला यायचा. दोन्ही पोरांना कडेवर घेऊन जत्रेत फिरायचा, पिपाणी घेऊन द्यायचा. देवाला नैवेद्य म्हणून कोंबडी दारातच कापायचा. मानेवर उसळलेली रक्ताची धार बघून, देव शांत झाला असेल म्हणून आनंदी व्हायचा. बायकोला हे आवडायचं नाही. मुकं जनावर असलं तरी तेचा पण जीव हाय म्हणून शामूला समजवायची.

जत्रेच्या दिवशी पै-पाव्हणं यायची. कुठेही पंगतीत बसायची.गावकरी हाळी मारून जेवायला बोलवायची. प्रसाद म्हणून कुणी नाही म्हणत नव्हतं. संध्याकाळी वातावरण शांत झाल्यावर पाहुणे झाडाखाली ताडपत्रीवर 'देव देव झाला' म्हणत अंग टाकायचे. आणि दुसरा दिवस उजडायचा.

मग शामू बायकोच्या माहेरची जत्रा करायला पोराबाळांना घेऊन निघायचा. सासरा पुर्वी गावात रेडा कापायचा पण आता त्याने ठरवलं होतं की हत्या करायची नाही म्हणून शामूनेच मेव्हणीने बोललेल्या नवसाचा बोकड कापला. ही पोरांना घेऊन आत बसली होती. एकदा तिने मुक्या प्राण्याच्या डोळ्यातली करुणा पाहिली होती आणि नवऱ्याच्या डोळ्यातली क्रुरता. काही मेळ जमत नव्हता.

घरात मायंदाळ लोकं होती म्हणून ती तांब्या घेऊन वगळीला गेली. तासभर झाला तरी परत आली नाही म्हणून शामू माळरान तुडवत वगळीकडे गेला. कुणीतरी तिचं तोंड दाबून बळजोरी करताना दिसला. शाम्याने तांब्या उचलून हाताच्या मुठीत घेतला आणि जीव खाऊन पाठीमागून त्याच्या डोक्यात मारायला गेला आणि अचानक तिचे डोळे दिसले ते म्हणत होते

'माणसातबी जनावर असतंय तेचा जीव घेऊ नका '.

पहिल्यांदा शामूला कुणाच्यातरी डोळ्यात तथागताची करुणा दिसली. याचा फायदा घेत तो पसार झाला.

घरी परत जात असताना पायाखालची सावली हळूहळू मोठी होत गेली. दूरवर मुले पिपाणी वाजवीत होती आणि दोघे माळरान तुडवत घराकडे निघाले होते. शामूच्या अश्रूने माळरान जणू हिरवेगार झाल्याचा भास तिला झाला.


काळेअडी फाटा–Yogesh Inamdar

$
0
0

किती सहज आणि सुंदर अनुभव सांगितला आही...गोष्ट अशीच तर असते...

काळेअडी फाटा – योगेश इनामदार

ऑफिस सुटल्यावर घरी परतताना, ३७० नाही मिळाली तर वाकड ते काळेवाडी फाटा रिक्षाने येणे हा शिरस्ता...

आज अश्याच एका 'चला, फाटा धा रुप्ये' मध्ये बसलो... माझ्या आधी डाव्या बाजुने येवुन एक रेघाळा शर्ट बसला होता, मी जावुन मध्ये बसलो. इतक्यात एक फिकट आकाशी शर्ट, गळ्यात निळागर्द रुमाल व त्यावर पिवळे ठिपके व हातात पिशवी डाव्या बाजुने बसायला पाहत होता.....पण रेघाळा शर्ट त्याला 'फुडे बस ना' असं म्हटला.

निळा रुमाल शनिवार 'साजरा' करुन आला होता, मग चालक महाशयच त्याला ' ए जौदे बस फुडं' म्हटला. निळा रुमाल मग फुडं बसला. त्याचा शनिवार एवढा जोरदार साजरा झाला होता की त्या मद्यगंधाने पाचेक सेकंद मलाही गरगरलं......चालकाला मी न रेघाळा शर्ट ' चल न भावा' म्हटलो, तो 'दोन मिंट सर, अजुनेकच शीट घ्यु' म्हटला, तेवढ्यात एक लेदर जाकिट, जीन्स अन कानात बाळीवाला बाळु येवुन धडपडला......आता मी मध्यभागी होतो.

रिक्षा सुरु होताच लेदर जाकिट ने गायछाप अन चुना काढला, मळला अन त्यात अजुन एक विमल टाकुन ते पंचगव्य तोंडात सारले......एकही कण न सांडता त्याने केलेल्या या सव्यापसव्याचे मला कौतुक वाटले.....

रिक्षा दहा फुट पुढे जाताच एका गुलाबी साडीने हात दाखवला व रिक्षा थांबली......गुलाबी साडीकडे दोन पिशव्या, पैकी एकीत तीन किलोचे गॅस सिलींडर होते.....साडी सोबत तिचा चारपाच वर्षाचा पिंटुपण होता. 'र्हाटनीफाट्याला जानार का?' असं साडीनं विचारलं......'हौ चला न' असं रिक्षाचालक म्हणताच 'मग ठीकै इतं स्वळा नंबरला सोडा' असं म्हणुन रिक्षात घुसली. रेघाळा शर्ट स्वत:ला शक्य तेवढा आक्रसता झाला.

पाच मिंन्टात 'स्वळा नंबर' आलं. गुलाबी साडी अन पिंटु उतरले तसा लेदर जाकिट पण उतरला. त्या दोघांना ही पाहुन निळा रुमाल ही उतरण्याच्या तयारीत होता पण चालक त्याला ओरडला

'ऐ,बस काळेअडी फाटा नै हे'......

गुलाबी साडीने पैसे देताच, पिंटु एकदम कमरेवर हात ठेवत 'जाउ द्या पुढं' असा क्युट बोलला......पुढे एक पांढरी ज्युपिटर थांबली होती, त्यावरची टीशर्ट जीन्स दुसऱ्या टीशर्ट जीन्सला सोडायला आली होती. दुसरी जरा बरी होती, तिने 'फाटा?' असं विचारलं, पण मागुन दुसरी रिक्षा पटकन येवुन तिला घेवुन गेली......आमच्या चालकाने मकार भकार बोलले त्याला अन पुढे चालता झाला......

पाच मिनीटानी काळेअडी फाटा आला न मी व रेघाळा शर्ट उतरलो

मित्र–कौस्तुभ सामक

$
0
0

गोष्ट आपल्या आजूबाजूलाच असते...डोळे उघडे पाहिजेत...

मित्र – कौस्तुभ सामक

स्वारगेट बस स्थानक...

दोन पोर बसची वाट पहात बसली आहेत. वय अंदाजे १५ किंवा १६ वर्षे. दोघे अत्यंत स्वस्थ चित्त...मस्त गप्पा मारण्यात दंग. वाटल इथेच ते कैक वर्षे असेच बसले असतील आणि कदाचित आणखी कितीतरी वर्ष स्वतः हरवून इथेच बसून रहातील.

मी त्यांच्या शेजारी बसलो...माझ्या बसची वाट पहात. त्यांच्या बोलण्यातून लक्षात आल...एक हिंदू आणि एक मुस्लीम. ते हसत होते...खोड्या काढीत होते एकमेकांच्या...आनंद घेत होते एकमेकांच्या सहवासाचा....हीच तर भारताची पुढची पिढी. एक प्रश्न मनाच्या खोल गाभार्यात उमटला...ते जेंव्हा पंचविशी गाठतील तेंव्हा सुद्धा ते असेच मित्र रहातील की धर्मांध हिंदू आणि मुस्लीम होतील?

त्यांनी आयुष्यभर माणूस रहाव आणि एकमेकांचे मित्र रहाव म्हणून मी मनोमन प्रार्थना करू लागलो. माझ्या डोळ्यांसमोर आला “शेर” मैंने कभी गीता और कुरआन को लड़ते हुऐ नहीं देखा । इनके लिए लड़नेवालोको , कभी पढ़ते हुए नहीं देखा ।

बाळा-संजन मोरे

$
0
0

किती गहिरी कथा आहे ही बाळाची!!

बाळा-संजन मोरे

उम्या असला की दिवस कसा जातो कळत सुद्धा नाही. रानमेव्याने गच्च भरलेले खिसे अन ट्म्म झालेलं पोट घेवून बाळा घरात शिरला. आई लवकरच आली होती. अजून झाडलोट झाली नव्हती. आता नक्की ती रागावणार ! तोंडात पदराचा बोळा खूपसून ती चूलीपाशी सुम्म बसून होती. अंधारात तशीच. बाळाने लाईट लावला. आईचं मुसमुसनं त्याला जाणवलं. आईला किती सांगू अन किती नको असं बाळाला होवून गेलं होतं, पण क्षणात सगळं आटून गेलं. पुन्हा आईचं आज काहीतरी बिनसलंय. काकाबरोबर भांडण झालं असणार. त्याला काका आवडतच नव्हता. सगळ्यांसमोर आईला एकेरी बोलतो. त्याच्या त्या घाऱ्या डोळ्याची बाळाला भिती वाटते. बाळा अजून लहान आहे ना ! काका उंचापुरा, धिप्पाड आहे, नजर करारी आहे, त्याच्या अक्कडबाज मीशा उग्र वाटतात…….

बाळाने झाडू घेतला, आतली, बाहेरची, दोन्ही खोल्या झाडून काढल्या. ओटा झाडला. तो पर्यंत आईने चहा ठेवला होता. हातपाय धुवून बाळा चहा प्यायला आला. स्टीलच्या फुलपात्रातला चहा बशीत ओतून बाळा चहा पिवू लागला. आईचे हात थरथरत होते. बशीतला चहा तीला पिता येईना. तीने बशी खाली ठेवली. बाळाची अन तिची नजरानजर झाली. ओठ भप्प सुजला होता. डोळा काळा निळा पडला होता. चेहर्यािवर काळपट खूणा दिसत होत्या. बाळाच्या काळजात कळ उठली.

“ आई …“ बाळाच्या रडवेल्या आवाजाने आईचा बांध फूटला. ती ओक्साबोक्सी रडू लागली. बाळा आईच्या गळ्यात पडला. तिचे सारे अंग ठणकत होते.

“ बाळा ..तू लवकर मोठा हो....हा अल्लडपणा सोडून दे ...मला मग कूणाची गरज भासणार नाही रे …” आई रडत होती.

बाळाने तिला रडू दिले. मग पदराने तिचे डोळे पूसले. चमच्याने तिला चहा पाजला.

बिचारी … एक पोर पदरात टाकून नवरा अकालीच निघून गेला होता. ना भावकीचा आधार, ना गणगोत. पोटापुरती शेती पण कोण करणार? कशी करणार? करायची माहिती नाही. याने मग आधार दिला. शेती बघू लागला. चार पैसे मिळू लागले. बाळाच्या वडिलांचा मित्र हा. आधार वाटला. घरी यायचा, बसायचा, सूखदु:खाच्या गप्पा मारायचा. बरं दिसत नव्हतं ते. लोक वाईट साईट चर्चा करत होते, पण ही घट्ट राहिली. त्याला हाताच्या अंतरावर ठेवत आली. मोहाचे क्षण आले, आणले पण ही ठाम राहिली. तो निराश होत राहिला. उपाशी बाई, कधीतरी भूक उसळून येईलच की, या आशेवर दिवस काढत राहिला. अंगचटीला आला, चोरटे स्पर्श करत राहिला, तिचा होकार शोधत राहिला. नकार आल्यावर मग भांडत राहिला. दोन झापडी लगावून आजही धूमसत तो निघून गेला होता ……

“किती दिवस हे असंच चालू राहणार? किती दिवस हे असं होत राहणार? उद्या त्याला निक्षून सांगायला हवं! बाबारे ...तूझी मला गरज नाही. मी मोलमजूरी करेन पण तूझा आधार नको. बाळा मोठा झालाय, त्याला कळतं आता, वाईट साईट कानावर पडतं ! पोरगं दिवसभर भटकून आलंय, काहीतरी रांधायला हवंच. “ असा विचार करत ती आपलं दूखणं विसरून स्वयंपाकाला लागली. बाळा दफ्तर काढून अभ्यासाला बसला पण त्याचं मन लागत नव्हतं. काही गोष्टी समजत होत्या, काही कळत नव्हत्या. आईच्या वागण्याचं आकलन होत नव्हतं. उम्याच्या घरात भिंतीवर अडकवलेली फरशी कुऱ्हाड बाळाला राहून राहून दिसत होती, झूपकेबाज मिशांचं, उग्र घाऱ्या डोळ्याचं, काकाचं मस्तक त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. बाळाचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं !

जखमा–अर्चना हरीश

$
0
0

हो...अशीही मनोवस्था येतेच....किती जखमांचे ओझे व्हायचे?

जखमा – अर्चना हरीश

पुन्हा एकदा ती कुणाशीही बोलायचं टाळते

पुन्हा एकदा ती सहन्भूतीचे शब्द आणि मायेची उब टाळते

पुन्हा एकदा ती गुंतण्यापासून दूर पळते

पुन्हा एकदा ती आपल्या बिळात शिरून बसते...

ती उरावर आणखी जखमा घ्यायला आता खूप घाबरते!!

मरण झोप–Abhiruchi Dnyate

$
0
0

नाते काय फक्त माणसाशी जुडते? ते तुटताना पहाणे अनुभवणे ह्या पेक्षा मरण बेहतर

मरण-झोप – अभिरुची ज्ञाते

खूप मोठ्ठी जागा.. झाडांनी गच्च भरलेली.. झाडं कसली भले थोरले वृक्षच.. त्यांवर कित्येक पक्ष्यांची घरटी.. सतत चिवचिवाट, किलबिलाट आणि लिहून दाखविता न येणारे कित्येक आवाज. सकाळच्या वेळी आणि सांजेच्या अगोदर पक्ष्यांच्या दंगामस्ती, चर्चासत्र, चिडवाचिडवी बघण्या आणि ऐकण्याजोगे असायच्या. दिवस जात होते आणि पक्ष्यांचा तिथला वावर वाढत होता. एके दिवशी त्या जागेच्या मालकाला वाटलं त्या जागेवर आपल्या हक्काचं काहीतरी हवं.

त्याच्या वाटेत कुणी येणारं नव्हतं. निसर्गच काय तो उभा ठाकलेले पण तो तर कशालाच विरोध न करणारा म्हणजे तात्विक अर्थाने मुकाच की..एका दिवसात सगळे वृक्ष भुईसपाट झाले. तोडणारा म्हणाला, 'सायबांनी सांगितलंय उद्या सकाळ पातुर काम व्हायला होवं.' दिल्या पैशांना जगणारा इसम तो. त्या संध्याकाळी पक्ष्यांचे आवाज ऐकायला नाही आले. उडताना दिसले दोन चार. हे तोडातोडीचं काम दिवस लख्खं उजाडल्यावर करायला घेतलं म्हणून बरं नाहीतर अवघड झालं असतं.

पण माझी आजी म्हणायची, 'मरण झोपेत आलेलं बरं असतं.'

Viewing all 1118 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>